Uddhav Thackeray: बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे कुठे होते, भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं, उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका

बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक दावा केल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. बाबरी जेव्हा पाडली त्यावेळी हे लोक कुठे होते असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  बाबरी पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात  लपले होते.  आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement