अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी; तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र

वाटेगाव येथे साठे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी तेलंगणा सरकार केंद्राला पत्र लिहिणार आहे.

KCR

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी प्रसिद्ध मराठी कवी आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याबाबत भाष्य केले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे साठे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी तेलंगणा सरकार केंद्राला पत्र लिहिणार आहे. अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेदेखील केंद्राला पत्र लिहावे असे केसीआर म्हणाले. केसीआर आज एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. (हेही वाचा: Sharad Pawar On Surgical Strike: देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला- शरद पवार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement