मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: 7 तलावांमधील पाणीसाठा 88.40 टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांतील पाणीसाठा गेल्या चार दिवसांत दीड टक्क्याने घटून ८८.५० टक्क्यांवर आला आहे. पावसाने उघडीप दिल्याने आणि अल निनोच्या शक्यतेमुळे आगामी काळातील पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Lake प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांत एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. ७ ऑगस्ट रोजी या जलाशयांत १२ लाख ८० हजार ९३१ दशलक्ष लिटर इतका साठा नोंदवला गेला, जो एकूण गरजेच्या ८८.५० टक्के आहे. याआधी ३ ऑगस्ट रोजी हाच साठा ९०.०६ टक्के इतका होता. म्हणजेच अवघ्या चार दिवसांत साठ्यात दीड टक्क्याची घट झाली आहे. मागील तीन दिवसांपासून तलाव क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्याने साठा वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे चित्र आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement