मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: 7 तलावांमधील पाणीसाठा 88.40 टक्क्यांवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांतील पाणीसाठा गेल्या चार दिवसांत दीड टक्क्याने घटून ८८.५० टक्क्यांवर आला आहे. पावसाने उघडीप दिल्याने आणि अल निनोच्या शक्यतेमुळे आगामी काळातील पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांत एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. ७ ऑगस्ट रोजी या जलाशयांत १२ लाख ८० हजार ९३१ दशलक्ष लिटर इतका साठा नोंदवला गेला, जो एकूण गरजेच्या ८८.५० टक्के आहे. याआधी ३ ऑगस्ट रोजी हाच साठा ९०.०६ टक्के इतका होता. म्हणजेच अवघ्या चार दिवसांत साठ्यात दीड टक्क्याची घट झाली आहे. मागील तीन दिवसांपासून तलाव क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्याने साठा वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे चित्र आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Indus Waters Treaty: युद्धबंदी झाली असली तरी सिंधू पाणी करार स्थगित राहील; परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
Advertisement
Advertisement
Advertisement