Maharashtra Monsoon 2022 Update: रायगड, चिपळूण ते कोल्हापूर मध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ; मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्याधिकार्‍यांना अलर्ट राहण्याचे निर्देश

चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

Eknath Shinde (Photo Credits: Twitter)

मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस बरसत आहे. या बरसणार्‍या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देण्याचे आदेश आहेत तसेच सार्‍या जिल्हाधिकार्‍यांना अलर्ट राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement