जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

समर्थ रामदास स्वामी यांनी जांबसमर्थ मध्ये 1535 मध्ये या मूर्तींची स्थापना केली होती.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी 1535 मध्ये या मूर्तींची स्थापना केली होती. आज सकाळी स्थानिकांना मूर्त्या न दिसल्याने त्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.