Amravati Violence: अमरावतीत तीन दिवस इंटरनेट सेवा बंद, अफवा रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय

अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील ३ दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचारामुळे आज अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. या जमावाला मागे हटवण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला, त्यामुळे हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील ३ दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement