Raj Thackeray: राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अजामीनपात्र वॉरंट रद्द
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सांगली येथील आंदोलनास राज ठाकरे यांनी चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात राज ठाकरे यांनी सन 2013 मध्येच दोषमुक्तीचा अर्ज केला होता. मात्र न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 27 ऑक्टोबर 2021 रोजी हा अर्ज फेटाळून लावला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सांगली येथील आंदोलनास राज ठाकरे यांनी चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात राज ठाकरे यांनी सन 2013 मध्येच दोषमुक्तीचा अर्ज केला होता. मात्र न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 27 ऑक्टोबर 2021 रोजी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राज ठाकरे यांनी 11 जुलै 2022 रोजी पुन्हा एकदा अर्ज केला. परंतू न्यायालयाने तोही फेटाळून लावला. उलट राज ठाकरे यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट निघाले. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द करत राज ठाकरे यांना दिलासा दिला. तसेच, इस्लामपूर सत्र न्यायालयाला नव्याने सुनावणी घेण्यासही सांगितले. सांगली येथील घटना घडली तेव्हा आपण अटकेत होते. त्यामुळे या आंदोलनाला आपण चिथावणी दिली असे म्हणता येणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.