Mumbai: विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तिघांवर गुन्हा दाखल

चेंबूरमध्ये माहुल परिसरात विहिरीत पोहताना एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विहिरीत मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हॉटेलसाठी पाणी काढण्यासाठी गेला होता.

Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai: चेंबूरमध्ये माहुल परिसरात विहिरीत पोहताना एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विहिरीत मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. हॉटेलच्या कामासाठी पाणी काढण्यासाठी विहिरीत गेला होता. विहिरीत बेकायदेशीररीत्या मोटार लावली होती. या मोटारच्या विजेचा धक्का लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अनंत माहुलकर, दयाराम माहुलकर आणि हरिराम माहुलकर या हॉटेल मालकांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा- उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेले वाहन बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडले)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement