Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार तुरुंगातून सुटका; शिक्षा भोगत असलेल्या 6 आरोपींच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Supreme Court (Photo Credit - Twitter)

Rajiv Gandhi Assassination Case: माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला. या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले.

नलिनी आणि रविचंद्रन यांनी त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने सांगितले की, या खटल्यातील दोषींपैकी एक असलेल्या एजी पेरारिवलनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाबतीतही लागू आहे. खरे तर, 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते. त्याने 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement