निर्बंध असूनही पंजाब मोगामध्ये पराळी जाळल्याची घटना, कृषी विभागाचा कारवाईचा इशारा
पेंढा जाळल्यामुळे निघणाऱ्या धुरात पार्टिक्युलेट मॅटर (पीएम), कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे हानिकारक प्रदूषक असतात. याचा स्थानिक आणि प्रादेशिक हवामानावर लक्षणीय परिणाम होतो.
पंजाबमध्ये पराळी (पिकांचे अवशेष) जाळण्याच्या घटना थांबत नाहीत. आता पंजाबमधील मोगा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पराळी जाळल्याचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी रान पेटवल्यानंतर अग्निशमन दल आणि कृषी विभागाच्या पथकांनी आग विझवली. शेतकरी त्यांच्या पिकाची कापणी केल्यानंतर, शेतात उरलेले पिकांचे देठ जाळतात. शेतकरी पिकांचे अवशेष साफ करण्यासाठी आणि पुन्हा पेरणीसाठी त्यांचे शेत तयार करण्यासाठी भुसकट जाळतात. पेंढा जाळल्यामुळे निघणाऱ्या धुरात पार्टिक्युलेट मॅटर (पीएम), कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे हानिकारक प्रदूषक असतात. याचा स्थानिक आणि प्रादेशिक हवामानावर लक्षणीय परिणाम होतो.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)