जगातील 80 टक्के लोक किटकांचे सेवन करतात, भारतात 100 प्रजाती खाण्यायोग्य

भविष्यात अन्नसंकटातील आव्हानाला तोंड देण्यासाठी कीटकनाशक किती प्रभावी ठरू शकेल याची शक्यता शोधून काढण्यासाठी आणि अशा कीटकांच्या प्रजातींचे अस्तित्व वाचवण्यासाठी आपल्या प्रकारचा पहिला प्रयत्न भारतात सुरू झाला आहे

Insects (Photo Credits-Twitter)

भविष्यात अन्नसंकटातील आव्हानाला तोंड देण्यासाठी कीटकनाशक किती प्रभावी ठरू शकेल याची शक्यता शोधून काढण्यासाठी आणि अशा कीटकांच्या प्रजातींचे अस्तित्व वाचवण्यासाठी आपल्या प्रकारचा पहिला प्रयत्न भारतात सुरू झाला आहे. त्यासाठी उत्तर-पूर्व राज्यांमध्ये खाण्यायोग्य कीटकांचे संशोधन केले जात आहे. अन्नाचे संकट आणि विशेषत: पोषण अभावाचे निराकरण करण्यासाठी, देश आणि जगात नवीन संशोधन केले जात आहे. त्याचसोबत भारतामधील 100 किटकांच्या प्रजाती खाण्यायोग्य आहेत.

तर वैज्ञानिकांची नजर आता किटकांवर गेली आहे. जे पारंपरिक भोजनाचा अभिन्न भाग आहे. तसेच पोषक तत्वांची सुद्धा पूर्ती करु शकतात. तर उत्तराखंड मधील अल्मोडा स्थित जीबी पंत राष्ट्रीय हिमालय पर्यावरण शोध आणि विकास संस्थान किटकांच्या प्रजातींबाबत अधिक अभ्यास करत आहेत. खरंतर जगातील 80 टक्के लोक परंपरागत किटकांचे सेवन करतात. भारतात मोठ्या संख्येने तर किटकांचे प्रमाण नाही आहे. पण देशाच्या पूर्वोत्तर राज्य मणिपूर, अरुणाचल आणि नागालॅन्ड येथे पोषक तत्व युक्त किटक बाजारात विक्रीसाठी ठेवले जातात. मात्र येणाऱ्या पुढील काळात किटकांच्या प्रजाती संपुष्टात येणार का याबाबत वैज्ञानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.(महिलेने घरात पाळले होते तब्बल 140 साप; मृत्युसमयी गळ्यात आढळला 8 फुटाचा अजगर)

वैज्ञानिकांच्या मते पूर्वोत्तर राज्यात किटकांच्या विविध प्रजाती अगदी सहजपणे खातात. त्यामधून लोकांना उच्च उर्जा आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतात. आतापर्यंत 399 विभिन्न किटकांच्या प्रजाती चिन्हांकित केले गेले आहेत.देशातील पहिली ऑनलाईन किटकांसंबधित लायब्रेरी सुद्धा सुरु करण्यात येणार आहे. जगभरातील किटकांची 15000 पेक्षा अधिक प्रजाती मानव खाद्यपदार्थ म्हणून करु शकतो. भारतात 100 प्रजाती खाण्यायोग्य असून त्यांच्याबाबत रासायनिक अभ्यास केला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement