Ramdas Athawale on Rahul Gandhi: कुंभमेळ्याला भेट दिली नाही, मतदारांनी राहुल गांधी, Uddhav Thackeray यांच्यावर बहिष्कार टाकावा- रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर महाकुंभ 2025 ला उपस्थिती न लावलेबद्दल हिंदूंचा अनादर केल्याचा आरोप केला. त्यांनी हिंदू मतदारांना बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

Ramdas Athawale | (Image Credit - Twitter)

Mahakumbh 2025: केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात (Prayagraj Kumbh Mela) सहभागी न होऊन हिंदू समुदायाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. हिंदू धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी हिंदू मतदारांनी (Hindu Voters) या दोघांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेते आणि केंद्रीय मंत्री असलेल्या या व्यक्तीमत्वाने अशा प्रकारचे विधान केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

'ठाकरे आणि गांधी कुटुंबाने हिंदुत्वाचा अपमान केला'

रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले: ठाकरे हिंदुत्वाबद्दल बोलतात पण प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी झाले नाहीत. राहुल गांधी यांनीही प्रयागराज येथील कुंभमेळा या धार्मिक उत्सवास भेट दिली नाही. त्यामुळे ठाकरे आणि गांधी कुटुंबाने हिंदुत्वाचा अपमान केला आहे. आठवले यांनी पुढे आरोप केला की ठाकरे आणि गांधी कुटुंब दोघांनीही हिंदू मतांची मागणी करूनही 2025 च्या महाकुंभात सहभागी न होऊन हिंदू परंपरांचा अनादर केला आहे. हिंदू असणे आणि महाकुंभात सहभागी न होणे हा हिंदूंचा अपमान आहे आणि हिंदूंनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Ramdas Athawale: मनात होते पण राऊन गेले; रामदास आठवले यांची इच्छा अपूर्ण)

'हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा'

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी यावर भर दिला की, सार्वजनिक भावनांचा आदर करण्यासाठी महाकुंभात उपस्थित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना (राहुल गांधी, उद्धव ठाकरे) नेहमीच हिंदू मते हवी असतात, तरीही त्यांनी महाकुंभात सहभागी झाले नाही. माझे अवाहन आहे की हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, नोव्हेंबर 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी आधीच संदेश दिला होता, जिथे विरोकांना निवडणुकीतील पराभवाचा सामना करावा लागला. (हेही वाचा, Maha kumbh 2025: महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभमेळ्यात भाविकांनी केली गर्दी, प्रशासन कडक सुरक्षा यंत्रणेसह सज्ज)

महाकुंभ 2025: जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा

प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे आयोजित 45 दिवसांचा महाकुंभ 13 जानेवारी 2025 (पौष पौर्णिमा) रोजी सुरू झाला आणि 26 फेब्रुवारी (महाशिवरात्री) रोजी संपणार आहे. दर 12 वर्षांनी एकदा होणाऱ्या या महा धार्मिक कार्यक्रमाला देशभरातून अंदाजे 65 कोटी भाविकांनी हजेरी लावली आहे.

कुंभमेळ्यामध्ये अनेक स्नान विधी साकारले आहेत, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:

  • पौष पौर्णिमा: 13 जानेवारी
  • मकर संक्रांती: 14 जानेवारी
  • मौनी अमावास्या: 29 जानेवारी
  • बसंत पंचमी: 3 फेब्रुवारी
  • माघी पौर्णिमा: 12 फेब्रुवारी
  • महाशिवरात्री (अंतिम स्नान दिवस): 26 फेब्रुवारी

महाकुंभात नागा साधूंच्या भव्य मिरवणुका आणि तीन अमृत स्नान झाले आहेत, ज्यात भारताच्या विविध भागांतून भाविक गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत. जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा म्हणून, महाकुंभ 2025 राजकीय चर्चेचे केंद्र बनले आहे, विविध पक्षांचे नेते धार्मिक भावनांशी जोडण्यासाठी या कार्यक्रमाचा वापर करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now