Pune Railway Station Thefts: पुणे रेल्वे स्थानकावरील चोरीच्या घटनांमध्ये वाढ; 7.99 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू गायब, 1000 हून अधिक प्रकरणे अद्याप उलगडलेली नाहीत

अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारी रेल्वे पोलिसांनी यातील (GRP) फक्त 220 प्रकरणे सोडवली आहेत, ज्याद्वारे 1.02 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू परत प्राप्त झाल्या आहेत. मात्र, 1.087 प्रकरणे अद्याप उलगडलेली नाहीत, ज्यामध्ये 6.96 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू अजूनही परत मिळालेल्या नाहीत.

Theft (PC - Pixabay)

गेल्या काही काळापासून पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) हे चोरीचे (Thefts) केंद्र बनले आहे. गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी 1,307 चोरीच्या घटना घडल्या असून, त्यात एकूण 7.91 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारी रेल्वे पोलिसांनी यातील (GRP) फक्त 220 प्रकरणे सोडवली आहेत, ज्याद्वारे 1.02 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू परत प्राप्त झाल्या आहेत. मात्र, 1.087 प्रकरणे अद्याप उलगडलेली नाहीत, ज्यामध्ये 6.96 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू अजूनही परत मिळालेल्या नाहीत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक (जीआरपी, पुणे) प्रमोद खोपीकर, यांनी द फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, ‘आमची टीम नियमितपणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म आणि इतर परिसरात गस्त घालत असते. पुणे रेल्वे स्थानकावर दररोज मोठी गर्दी होते आणि ती व्यवस्थापित करणे हे एक आव्हान आहे. रेल्वे स्थानक सर्व बाजूंनी पूर्णपणे सुरक्षित नाही, ज्यामुळे गुंडांना आमंत्रण मिळते. मात्र, आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत परंतु अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.’

यासोबतच, रेल्वे स्थानकावर भिकारी आणि मद्यपींमुळे होणाऱ्या वाढत्या त्रासाचाही सामना करावा लागत आहे. रेल्वे अधिकारी आणि प्रवाशांच्या मते, या धोक्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे स्टेशनपासून फक्त 20-30 मीटर अंतरावर असलेली दारूची दुकाने. या ठिकाणी बरेच लोक दारू खरेदी करतात, मद्यपान करतात आणि नंतर रेल्वे स्थानकाचा वापर फिरण्यासाठी किंवा झोपण्यासाठी वापरतात, ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय होते. वारंवार तक्रारी करूनही, या वाढत्या त्रासावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. (हेही वाचा: Nagpur Violence: नागपूर हिंसाचार प्रकरणातील 17 आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी)

नाव न छापण्याच्या अटीवर, रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘रेल्वे स्टेशनवर नियमितपणे 20 हून अधिक भिकारी आढळू शकतात. मात्र, आम्ही त्यांना रेल्वे स्टेशनवर येण्यापासून रोखण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. आमची टीम त्यांना अशा लोकांची काळजी घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडे पाठवते. मात्र, ते पुन्हा स्टेशनवर येतात. त्याचप्रमाणे, मद्यपींवर कारवाई केली जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement