Mumbai Road Accidents: मुंबईत यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 164 जणांचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीत समोर आली माहिती

अहवालानुसार, यंदा मृत्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. अधिकारी या वर्षाच्या सुधारित आकडेवारीचे श्रेय अनेक प्रमुख उपायांना देतात.

Mumbai Road Accidents: मुंबईत यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 164 जणांचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीत समोर आली माहिती
Road Accident

वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबईत रस्ते अपघातात (Mumbai Road Accidents) 164 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत रस्त्यांवरील मृत्यूच्या संख्येत ही लक्षणीय घट आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी, जुलैपर्यंत मृत्यू नसलेले 152 अपघातही नोंदवले गेले, अशी आकडेवारी सांगते.

गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 229 जणांना जीव गमवावा लागला होता. जानेवारी-जुलै 2022 मध्ये ही संख्या 212 होती. त्याआधी 2021 मध्ये 225 लोकांचा मृत्यू झाला, 2020 मध्ये 167 लोकांचा मृत्यू झाला आणि 2019 मध्ये 264 जणांचा मृत्यू झाला.

अहवालानुसार, यंदा मृत्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. अधिकारी या वर्षाच्या सुधारित आकडेवारीचे श्रेय अनेक प्रमुख उपायांना देतात. जसे की- शहरातील 32 अपघात प्रवण ठिकाणे ओळखणे आणि खड्डे आणि रस्त्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि बीएमसी यांच्यातील रिअल-टाइम समन्वय मजबूत करणे.

वाहतूक विभागाचे सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, ‘यंदा या संख्येत घट झाली असली तरी, एकही मृत्यूही अस्वीकार्य आहे.’ फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारलेल्या कुंभारे यांनी नागरिकांची सुरक्षा सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये 32 उच्च-जोखीम क्षेत्र चिन्हांकित करणे, रिफ्लेक्टर बसवणे, जवळपास 128 बेकायदेशीर स्पीड ब्रेकर काढणे आणि असुरक्षित पादचारी क्रॉसिंग टाळण्यासाठी रस्ता दुभाजकांची उंची वाढवणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Sion Bridge in Mumbai to Be Demolished: मुंबई येथील ऐतिहासिक सायन ब्रिज पुनर्बांधनीसाठी पाडला जाणार; वाहतूक मार्गात बदल, घ्या जाणून)

कुंभारे यांनी नमूद केले की, बीएमसी (प्रामुख्याने पावसाळ्यात पाणी साचणे आणि खड्ड्यांच्या समस्या हाताळते), समस्या सोडवण्यासाठी आणि वाहतूक व्यत्यय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधत आहे. या पावसाळ्यात, विशेषत: जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीदरम्यान, बीएमसीने रिअल-टाइम मदत दिली. जेव्हा जेव्हा टीमने खड्ड्यांची तक्रार केली, तेव्हा तेव्हा ते तातडीने भरून काढण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2024 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).