Lokmanya Tilak Punyatithi 2023 Quotes: लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार, पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Wallpaper द्वारे करा शेअर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) यांची आज पुण्यतिथी. लोकमान्य टिळक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणूनही टिळकांना ओळखले जाते. लोकमान्य हे भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. ते अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्षही होते.

Lokmanya Tilak Punyatithi Quotes: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', असे इंग्रजांना ठासून सांगणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैननि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) यांची आज पुण्यतिथी. लोकमान्य टिळक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणूनही टिळकांना ओळखले जाते. लोकमान्य हे भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. ते अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्षही होते. इतकेच नव्हे तर त्यांचे कार्य पाहून लोकांनी त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली.

लोकमान्य टीळक यांचे विचार

तुम्हाला यश निश्चित मिळेल! फक्त लोखंड गरम असते तेव्हाच प्रहार करा- लोकमान्य टिळक

मानवी जीवन असे आहे की, ते आपण उत्सवाशिवाय जगूच शकत नाही.. उत्सवांवर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे, म्हणूनच आपले सण जपले पाहिजेत- लोकमान्य टिळक

महान कार्ये कधीही सोपी नसतात, सहज होणारी कार्ये महान नसतात- लोकमान्य टिळक

जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तिथे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते- लोकमान्य टिळक

कर्तव्य मार्गावर गुलाब उगवत नाही किंवा त्यावर गुलाबपाणीही शिंपडले जात नाही- लोकमान्य टिळक

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रख्यात नेते बाळ गंगाधर यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. ते आधुनिक भारतातील प्रमुख वास्तुविशारदांपैकी एक होते, आणि ब्रिटीशांविरोधातील स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ समर्थक होते. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फादर ऑफ अनरस्ट इन इंडिया’ असे संबोधले. परंतु टिळक हे एक प्रगल्भ राजकारणी आणि प्रगल्भ विद्वान होते. राष्ट्राचा विकास करण्यासाठी स्वातंत्र्य हे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मानणाऱ्यांपैकी ते एक होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते म्हणून त्यांना मोठे श्रेय दिले जाते. त्यांना प्रेमाने ‘लोकमान्य’ म्हणजे ‘लोकांनी स्वीकारलेले’ म्हटले. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य आणि सर्वात सक्रिय नेते होते. ते महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या नंतरच्या नेत्यांसाठी मार्ग प्रशस्त करण्यासाठी ओळखले जातात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now