Kalyan-Dombivali: चिंता वाढली! परदेशातून परतलेल्या 109 लोकांशी संपर्क होऊ शकत नाही; अनेकांचे फोन बंद, घराला कुलूप 

सूर्यवंशी म्हणाले की, मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांची आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी विवाह, सभा आणि विविध कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जात आहे

Coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ (Omicron) धुमाकूळ घालत आहे. भारतातही त्याचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई या ठिकाणी या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. प्रशासन याबाबत सतर्क झाले असून, निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी सांगितले की, परदेशातून 295 लोक नुकतेच ठाणे जिल्ह्यातील या महापालिका क्षेत्रात परतले आहेत. परंतु त्यापैकी 109 जणांशी संपर्क होऊ शकत नाही.

यातील काही लोकांचे मोबाईल बंद येत आहेत, तर अनेकांनी दिलेल्या पत्त्यांवर कुलूप असल्याचे आढळले आहे. प्रशासन आता या लोकांची माहिती गोळा करत आहे आणि यंत्रणांना सतर्क करत आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या विषाणूबाबत धोका असलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या लोकांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा नियम केला आहे. अशा लोकांची सात दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी होते.

सूर्यवंशी म्हणाले की, मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांची आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी विवाह, सभा आणि विविध कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जात आहे. परंतु ठाणे जिल्ह्यात परदेशातून भारतामध्ये आलेले 109 जण अजूनही बेपत्ता आहेत. अशा प्रकरणांनंतरच मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी बीएमसीने फुल प्रूफ प्लॅन तयार केला होता.

दरम्यान, मुंबईतील दोन लोकांमध्ये Omicron प्रकाराची पुष्टी झाली आहे. दोघेही 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. त्यांचा कोविड आरटी-पीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला होता व त्यानंतर त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी एनआयव्ही, पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठवण्यात आले. ते सकारात्मक आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement