नाशिक मध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. 24 तासांत तेथे 644 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये 135 मिलीमीटर तर इगतपूरीत 170 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे जागोजागी पाणी साचले असून याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement