Cyclone Tauktae: तोक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टीदरम्यन काय काळजी घ्याल? रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यालगतच्या नागरिकांना दिली महिती

तसा इशारा भारतीय हवामान (Meteorological Department) खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा अधिकाऱ्यांनी (Ratnagiri District Collector) रत्नागिरी समुद्र (Ratnagiri Coast) किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आ

Cyclone Tauktae | (Photo Credits: IMD)

कोकण किनारपट्टीवर येत्या 16 ते 17 मे दरम्यना तोक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) येण्याची शक्यता आहे. तसा इशारा भारतीय हवामान (Meteorological Department) खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा अधिकाऱ्यांनी (Ratnagiri District Collector) रत्नागिरी समुद्र (Ratnagiri Coast) किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हावामान विभागाचा दाखला देत म्हटले आहे की, नागरिकांनी सतर्कता बाळगावी. चक्रीवादळ काळात नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

चक्रीवादळ काळात काय काळजी घ्याल?

हवामान विभागाने महाराष्ट्राला मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा इशारा दिला आहे दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची परीणिती चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पठ्ठ्याचे रुपांतर वादळात होईल. या वादळाला तोक्ते असे नाव देण्यात आले आहे. 15,16 आणि 17 मे या दिवशी येणाऱ्या या वादळामुळे मुसळधार पाऊस येऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif