चंद्रपूर: रेल्वेच्या धडकेत 100 पेक्षा अधिक बकऱ्यांचा मृत्यू
चंद्रपूर (Chandrapur) येथे रेल्वेच्या धडकेत 100 पेक्षा अधिक बकऱ्यांचा (Goat) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चंद्रपूर (Chandrapur) येथे रेल्वेच्या धडकेत 100 पेक्षा अधिक बकऱ्यांचा (Goat) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बकरी मालकाचे जवळजवळ लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
राजुरा येथील बल्लापूर मार्गावर आज सकाळी जवळजवळ 150 बकऱ्या रेल्वे रुळांजवळील एका शेतात घेऊन जाण्यात आल्या होत्या. मात्र अचानक बकऱ्यांचा कळप रेल्वेच्या दिशेने पळत सुटला. त्याचवेळी समोर येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एकाचवेळी सर्व बकऱ्यांचा मृत्यू झाला.(रत्नागिरी येथील आंबेनळी घाटात 800 फूट दरीत ट्रक कोसळला)
तर 100 बकऱ्या-मेंढ्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचसोबत बकरी मालकाचे तब्बल 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच नुकसान भरपाईसाठी आता मागणी केली जात आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement