Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

प्रवाशांनी भरलेली बोट एलिफंटा बेटावर जात असताना नौदलाच्या स्पीड बोटने पर्यटक बोटीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलं. प्रशासनाने आजपासून बोट स्वारांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन
Mumbai Boat Accident | X@RichaPinto

Mumbai Boat Accident: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gateway of India) बुधवारी एक भीषण अपघात (Accident) झाला. येथे गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटा बेटाकडे (Elephanta Island) जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली (Boat Capsizes). या अपघातात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर या बोटीतील 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले. प्रवाशांनी भरलेली बोट एलिफंटा बेटावर जात असताना नौदलाच्या स्पीड बोटने पर्यटक बोटीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलं. प्रशासनाने आजपासून बोट स्वारांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

प्रवाशांना लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक -

बुधवारी मुंबईत झालेल्या दुर्घटनेच्या एका दिवसानंतर अधिकाऱ्यांनी 'गेटवे ऑफ इंडिया'वरून बोटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक केले आहे. या घटनेतून बचावलेल्यांनी बोट चालवताना त्यांच्याकडे लाइफ जॅकेट नसल्याचा दावा केला होता. अधिकाऱ्यांच्या या पावलामुळे आगामी काळात अशा घटना टळतील. या नियमाबाबत गेटवे ऑफ इंडियावर तैनात असिस्टंट बोट इन्स्पेक्टर देविदास जाधव यांनी सांगितले की, प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचवेळी, सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घालावेत, अशा सूचना बोट मालकांना देण्यात आल्या आहेत. काही वेळा प्रवासी लाईफ जॅकेट परिधान करत नाहीत, त्यामुळे अपघातावेळी प्रवाशांचा जीव वाचवणे शक्य होत नाही. (हेही वाचा -Neelkamal Boat Accident in Mumbai: गेटवे जवळील बोट अपघात प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोट ड्रायव्हरविरुद्ध FIR दाखल)

समुद्राच्या मध्यभागी झाला अपघात -

बुधवारी नीलकमल नावाची पर्यटक बोट गेटवे ऑफ इंडिया येथून लोकांना घेऊन एलिफंटा बेटाकडे जात होती. यावेळी नौदलाच्या स्पीड बोटची नीलकमल बोटीला धडक बसली. त्यानंतर पर्यटकांनी भरलेली बोट उलटली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौसैनिकांचा समावेश आहे. या अपघातातील काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Neelkamal Boat Accident in Mumbai: गेटवे जवळील बोट दुर्घटनेत 13 जण मृत; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर- CM Devendra Fadnavis)

नौदलाने जारी केले निवेदन -

या अपघातानंतर नौदलाने एक निवेदन जारी करून सांगितले की, या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून बचावलेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेपत्ता झालेल्यांना वाचवण्यासाठी 4 नौदल हेलिकॉप्टर, 11 नौदल जहाजे, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस जहाजांसह शोध आणि बचाव कार्य करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2024 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).