Raksha Bandhan 2022 Dos and Don’ts:भाद्र कालावधी आणि पूजा विधीपासून ते पुजेची ताट आणि आरतीपर्यंत, रक्षाबंधन साजरे करताना लक्षात ठेवा 6 महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
पूजा आणि आरतीची थाळी सर्वात महत्त्वाची मानली जाते. या ताटात काही गोष्टी नसल्यास तुमचा विधी अपूर्ण मानला जातो. चला तर मग रक्षाबंधनाचा विशेष सण कसा साजरा करावा काय पूर्व तयारी करावी याबद्दल जाणून घेऊया, वाचा संपूर्ण माहिती
Raksha Bandhan 2022 Dos and Don’ts: रक्षाबंधन हा बहीण-भावाला समर्पित असलेला विशेष सण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधेपर्यंत उपवास करतात आणि राखी बांधून, बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी भविष्यासाठी प्रार्थना करतात. भावा-बहिणीसाठीचा हा पवित्र रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी रक्षाबंधन 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुरू होईल आणि सकाळी 12 ऑगस्टपर्यंत चालेल. बहिणी पौर्णिमेच्या दिवशीच त्यांच्या भावाला संरक्षक धागा बांधतात ज्याला राखी म्हणतात. रक्षाबंधनाच्या दिवशी, भावाला राखी बांधण्यापूर्वी बहिणींनी खूप तयारी करावी लागते, ज्यामध्ये पूजा आणि आरतीची थाळी सर्वात महत्त्वाची मानली जाते. या ताटात काही गोष्टी नसल्यास तुमचा विधी अपूर्ण मानला जातो. चला तर मग रक्षाबंधनाचा विशेष सण कसा साजरा करावा काय पूर्व तयारी करावी याबद्दल जाणून घेऊया, वाचा संपूर्ण माहिती[ हे देखील वाचा: Raksha Bandhan 2022 Date: रक्षाबंधनाचा सण यंदा 11 ऑगस्ट ला; जाणून घ्या काय आहे राखीपौर्णिमेचे महत्त्व?]
रक्षाबंधन पूजा विधी
राखीच्या दिवशी सकाळी स्नान करून देवतांना नमन करावे.
घरातील देवतांची पूजा करावी.
पूजेची ताट घ्यावी. तुम्ही चांदी, पितळ, तांबे किंवा स्टील यामधले कोणतेही ताट घेऊ शकता.
आता ताटात राखी, अक्षदा , मिठाई आणि कुंकू ठेवा.
सर्व प्रथम सजवलेले ताट पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि पहिली राखी बाल गोपाळ, गणपती किंवा इष्ट देवतेला अर्पण करा.
रक्षाबंधन प्लेट
तुमची प्लेट पूर्णपणे सजलेली असणे खूप महत्वाचे आहे. नवीन ताट घ्या, त्यावर गंगाजल टाकून ते पवित्र करावे. राखीचे ताट फुलांनी सजवावे. त्यात राखी, मिठाई, कुंकू, लाल दोरा, दही, अक्षदा आणि दिया यांचा समावेश असावा.
रुमाल
भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याला आसन किंवा लाकडी पाटावर बसवा आणि तुमच्या भावाच्या डोक्यावर रुमाल टाका.
कुंकू आणि अक्षदा
प्लेटमध्ये कुंकूआणि अक्षदा असावे. भावाच्या कपाळावर टीला लावून, सर्व प्रकारचे संकट टळावे अशी प्रार्थना बहिणी करतात. यानंतर अक्षदा चिकटवा.
आरती
बहिणींनी ताटात कापूर जाळून आपल्या भावांची आरती करावी. यानंतर भावाच्या मनगटावर राखी बांधावी.
मिठाई आणि भेटवस्तू
प्लेटमध्ये मिठाई असणे आवश्यक आहे. राखी बांधल्यानंतर बहिणींनी भावांना मिठाई खाऊ घालावी. मिठाईमुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. यानंतर भावांनी बहिणींना काहीतरी भेटवस्तू द्यावे. खरे तर पूजेचे ताट रिकामे राहू नये त्यासाठी काही तरी दिले जाते. तेव्हा पासून बहिणीला काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा निर्माण झाली. बहिणींनी भावाला रक्षणाचा धागा बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून आहे. राखीच्या सणामध्ये भाद्रची विशेष काळजी घेतली जाते कारण भाद्र काळात राखी बांधू नये. खरे तर धार्मिक दृष्टिकोनातून भाद्रा अशुभ मानले जाते, ज्यामुळे कोणत्याही शुभ कार्यात अडथळे निर्माण होतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)