Gauri Ganpati Visarjan Slogans: गौरी गणपती विसर्जनाला बाप्पाला निरोप देताना जोशात द्या या घोषणा!

महाराष्ट्रात यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू झाला असून, अनंत चतुर्दशीला २५ सप्टेंबर रोजी मुख्य गणपती विसर्जन होणार आहे. या निमित्ताने विसर्जनामागील परंपरा, त्याचे महत्त्व आणि राज्यभरातील प्रशासकीय तयारीचा हा आढावा.

Ganesh Visarjan

महाराष्ट्रात यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 रोजी सुरू झाला आहे. मूर्तीचे विसर्जन हे सृष्टीच्या पुनर्जन्म चक्राचे प्रतीक मानले जाते. काही कुटुंबांमध्ये दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस किंवा सात दिवसांतही गणपतीचे विसर्जन केले जाते, तर अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती ठेवण्याची परंपरा आहे. बाप्पाचे आगमन जितक्या जोशात केले जाते तितकेच त्याचे विसर्जन देखील दणक्यात करण्याची प्रथा आहे. मुंबई,  पुणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप देण्याची प्रथा आहे.  मग यावेळी बाप्पाला निरोप देताना खास घोषणा देत त्याचा निरोप घ्यायला विसरू नका.  Ganesh Visarjan 2026 Full Calendar: अनंत चतुर्दशी कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि विसर्जनाचे संपूर्ण कॅलेंडर.

उत्तरपूजेनंतर बाप्पाला पुढील वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत निरोप दिला जातो. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषात मूर्तीचे विसर्जन केले जाते. हा क्षण भाविकांसाठी भावनिक असतो, कारण दीड असो किंवा दहा-अकरा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर बाप्पाला निरोप द्यावा लागतो. हा क्षण गणेशभक्तांंना भावूक करणारा असतो.  नक्की वाचा: Ganesh Visarjan Slogans 2026: पुढच्या वर्षी लवकर या!' बाप्पाला निरोप देताना दुमदुमणार ही लोकप्रिय विसर्जन घोषवाक्ये 

गणेश विसर्जानाच्या घोषणा

  1. गणपती निघाले,खाली झाला मखर

    तुमची वाट पाहु बाप्पा

    पुढच्या वर्षी या लवकर

Ganesh Visarjan

2. १, २, ३, ४

बाप्पाचा जयजयकार!

 ५, ६, ७, ८
पुढच्या वर्षी भेटू थाटात!
Ganesh Visarjan

3. अर्धा लाडू फुटला,

गणपती बाप्पा उठला

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या...!

Ganesh Visarjan

4.   एक, दोन, तीन, चार.... बाप्पा आमचा सुपरस्टार !

विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलिसांसह राज्यातील विविध शहरांच्या पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरिकेडिंग, सीसीटीव्ही देखरेख आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही शांततापूर्ण आणि सुरक्षित उत्सवासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement