भजन सम्राट विनोद अग्रवाल यांचे निधन; राधा-कृष्णाचे भजन गाण्यासाठी ठरले होते लोकप्रिय

भजन सम्राट विनोद अग्रवाल यांचे आज सकाळी मथुरा येथे निधन झाले आहे, ते 63 वर्षांचे होते

विनोद अग्रवाल (Photo Credits: Instagram)

भजन सम्राट विनोद अग्रवाल यांचे आज सकाळी मथुरा येथे निधन झाले आहे, ते 63 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते छातीतील दुखण्याने त्रस्त होते. रविवारी त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र हळू हळू त्यांच्या प्रत्येक अवयवाचे कार्य थांबत गेले. शेवटी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

विनोद अग्रवाल यांचा जन्म 6 जून 1955 साली दिल्ली येथे झाला. अतिशय कमी वयातच ते हार्मोनियम वाजवायला शिकले होते. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. घरातल्या भक्तीमय वातावरणामुळे पुढे ते राधा-कृष्णाचे भजन गाण्यासाठी लोकप्रिय ठरले. त्यांनी आत्तापर्यंत विविध देशांत 1500 पेक्षा जास्त लाईव्ह शोज केले आहेत.

भजन गाताना कित्येकवेळा विनोदजींच्या डोळ्यात अश्रू आलेले लोकांनी पहिले आहेत. भजन गाताना ते मधे उर्दू शायरी गात असत आणि हीच त्यांच्या भजनाची खासियत होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack: 'दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केला निर्धार

Jammu and Kashmir: उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक जवान शहीद

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी सीमा हैदर, भारतात बॉयफ्रेंड सचिन मीना ला भेटायला 'अवैध'रित्या आली तिलाही 48 तासांत देश सोडावा लागणार?

Advertisement

Tourists From Pune Stranded In Jammu and Kashmir: पुण्यातील 500 हून अधिक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले; घरी परतण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement