PM Modi On UCC: देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू व्हावी ! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी समान नागरी संहितेवर केले मोठे विधान

78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले, ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. समान नागरी संहितेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता कायदा असायला पाहिजे. पीएम मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी संहितेवर अनेकदा चर्चा केली आहे.

PM Modi at Red Fort | X

PM Modi On UCC: 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले, ज्यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. समान नागरी संहितेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता कायदा असायला पाहिजे. पीएम मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी संहितेवर अनेकदा चर्चा केली आहे. नागरी संहिता सांप्रदायिक आहे, असे देशातील एक मोठा वर्ग मानतो. यात तथ्यही आहे. ही भेदभाव करणारी नागरी संहिता आहे. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना संविधान निर्मात्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक वर्गाने यावर चर्चा करावी असे मला वाटते. हे देखील वाचा: Indian Independence Day 2024: 'एक देश एक निवडणूक' धोरणाचा विचार व्हावा, 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची पंतप्रधान मोदी यांची योजना

धर्माच्या आधारे फूट पाडणाऱ्या कायद्यांना समाजात स्थान असू शकत नाही. आता देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असणे ही काळाची गरज आहे. सांप्रदायिक नागरी संहितेत आपण 75 वर्षे घालवली आहेत, आता आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे वाटचाल करायची आहे. तरच धर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावापासून मुक्तता मिळेल.

'काही लोकांना भारताची प्रगती दिसत नाही'

पीएम मोदी म्हणाले की, आम्ही दृढनिश्चयाने पुढे जात आहोत, परंतु असे काही लोक आहेत जे प्रगती पाहू शकत नाहीत. ते भारताच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत, कारण जोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही तोपर्यंत ते कोणाच्याही कल्याणाचा विचार करत नाहीत. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना टाळावे लागेल. ते निराशेच्या गर्तेत बुडलेले लोक आहेत. अशा लोकांपासून देशाला सावध राहावे लागेल.

मोदी म्हणाले की, जसजसे आपण बलवान होत जातो, तसतशी आपली आव्हानेही वाढत जातात. बाह्य आव्हानेही वाढणार आहेत. पण मला अशा प्रत्येकाला सांगायचे आहे की, भारताचा विकास कोणावरही संकट आणत नाही. आम्ही जगाला कधीही युद्धात नेले नाही. आपला देश बुद्धांचा देश आह, युद्धाचा नाही. मी जागतिक समुदायाला खात्री देतो की, त्यांनी भारताच्या प्रगतीची चिंता करू नये. कितीही आव्हाने असली तरी. आव्हान पेलणे भारताच्या स्वभावात आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement