Vande Bharat | Twitter

Air India Plane Crash: आज गुजरातमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात (Air India Plane Crash) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. या अपघातात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी 1:39 वाजता उड्डाण केले होते, ज्यामध्ये कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखालील दोन पायलट आणि दहा केबिन क्रू सदस्यांसह 242 लोक होते.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मते, विमानाने उड्डाणानंतर लगेचच 'मेडे' कॉल केला, परंतु हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष पुढील संपर्काला प्रतिसाद देण्यात अयशस्वी झाले. विमानतळाच्या बाहेर मेघना नगरजवळ हे विमान कोसळले, जिथे घटनास्थळावरून काळ्या धुराचे मोठे ढग उठताना दिसत होते. (हेही वाचा - (हेही वाचा - Vijay Rupani: एअर इंडियाच्या AI171 विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवासी असल्याचे वृत्त)

रेल्वेकडून विशेष वंदे भारत ट्रेनची घोषणा -

दरम्यान, भारतीय रेल्वेने गुजरातमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विशेष वंदे भारत गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. अहमदाबादहून दिल्लीला रात्री 23:30 वाजता एक विशेष वंदे भारत ट्रेन धावेल. त्याच वेळी, अहमदाबादहून मुंबईला मध्यरात्री 12 वाजता एक विशेष वंदे भारत ट्रेन धावेल. या विशेष वंदे भारत गाड्या अहमदाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी महत्वाच्या ठरणार आहेत. (हेही वाचा - Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या अपघातानंतर टाटा मोटर्ससह टाटा समूहाच्या 'या' प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण)

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण विमान आगीच्या भक्षस्थानी पडले. अनेक अग्निशमन गाड्या, रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकांना घटनास्थळी तातडीने तैनात करण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार, बचाव कार्य अजूनही सुरू आहे आणि मृतांच्या संख्येबद्दल अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.