Poor People in India: भारतासाठी आनंदाची बातमी, गेल्या 15 वर्षात तब्बल 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले- UN
अहवालात असेही म्हटले आहे की, आकडेवारी सुधारली असूनही, 2019-21 मध्ये भारतामध्ये 97 दशलक्ष गरीब मुले होती, जी जागतिक MPI मध्ये समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही देशामधील एकत्रितपणे गरीब लोक, मुले आणि प्रौढांची एकूण संख्या आहे.
याआधी हंगर इंडेक्समध्ये भारताची अवस्था पाकिस्तानपेक्षाही वाईट असल्याचे म्हटले गेले होते. आता संयुक्त राष्ट्राने (UN) भारताबाबत एक चांगली बातमी दिली आहे. संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, 2005-06 आणि 2019-21 दरम्यान भारतातील सुमारे 415 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर आले आहेत आणि या प्रकरणात एक 'ऐतिहासिक बदल' झाला आहे. यावरून हे दिसून येते की, शाश्वत विकासाअंतर्गत 2030 पर्यंत सर्व वयोगटातील पुरुष, स्त्रिया आणि मुलांमधील गरिबीचे प्रमाण निम्मे करण्याचे उद्दिष्ट देखील मोठ्या प्रमाणावर साध्य केले जाऊ शकते.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील ऑक्सफर्ड डिपार्टमेंट ऑफ पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) यांनी सोमवारी जारी केलेल्या नवीन बहुआयामी गरीबी निर्देशांक (MPI) नावाच्या अहवालात असे म्हटले आहे की, 2005-06 ते 2019-21 दरम्यान, भारतातील सुमारे 415 दशलक्ष लोक गरिबीतून वर आले आहेत. या अहवालाबाबत संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अवघ्या 15 वर्षांत भारतातील 415 दशलक्ष लोक गरिबीच्या चक्रव्यूहातून बाहेर येणे हा एक ऐतिहासिक बदल आहे.
भारतातील हा बदल शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी महत्त्वाचा केस स्टडी असल्याचेही यूएनने म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की 2020 च्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सर्वात जास्त गरीब लोक आहेत. येथील गरीबांची संख्या 228.9 दशलक्ष (22.89 कोटी) आहे. त्यानंतर नायजेरियाचा क्रमांक लागतो जेथे 96.7 दशलक्ष (9.67 कोटी) गरीब आहेत. प्रगती असूनही, भारताच्या लोकसंख्येवर कोविड-19 साथीच्या रोगाचा आणि अन्न व ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा परिणाम झाला आहे. (हेही वाचा: PM Kisan Samruddhi Kendras: पंतप्रधानांच्या हस्ते 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन)
अहवालात असेही म्हटले आहे की, आकडेवारी सुधारली असूनही, 2019-21 मध्ये भारतामध्ये 97 दशलक्ष गरीब मुले होती, जी जागतिक MPI मध्ये समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही देशामधील एकत्रितपणे गरीब लोक, मुले आणि प्रौढांची एकूण संख्या आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2022 09:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

