
Operation Sindhu: सध्या इराण आणि इस्त्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. अशातंच आता भारताने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन सिंदू (Operation Sindhu) मोहिम सुरू केली आहे. शनिवारी संध्याकाळी इराणची राजधानी तेहरान येथून 310 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे एक विशेष विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले. भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी सुरक्षितपणे परतण्याची खात्री करण्यासाठी केलेल्या समन्वित प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाढत्या प्रादेशिक तणावादरम्यान विद्यार्थ्यांना युद्धग्रस्त देशातून बाहेर काढण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांच्या प्रवास आणि आगमनासाठी सर्व आवश्यक व्यवस्था केली. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की विमानाने तेहरानहून सकाळी उड्डाण केले होते. तथापी, हे विमान आज दिल्लीत पोहोचले आहे. विमानाच्या आगमनानंतर आरोग्य आणि इमिग्रेशन प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आणि विमानतळावर विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य देण्यात आले. वाढत्या इस्रायल-इराण संघर्षादरम्यान त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित केल्याबद्दल विद्यार्थी आणि इराणमध्ये अडकलेल्या इतर भारतीयांनी सरकारचे मनापासून आभार मानले. (हेही वाचा -Iran Opens Airspace for Delhi Flight: भारतीय विद्यार्थ्यांसाठी इराणने उघडले हवाई क्षेत्र; 1 हजार विद्यार्थी घरी परतणार)
इराणमधून 310 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारे विमान दिल्लीत दाखल -
Another evacuation flight from Mashhad landed in New Delhi at 1630 hrs on 21 June with 310 Indian nationals from Iran.
With this, a total of 827 Indians have been evacuated. pic.twitter.com/C1w8aVNWOs
— Randhir Jaiswal (@MEAIndia) June 21, 2025
दरम्यान, शुक्रवार उशिरा इराणच्या मशहाद येथून 290 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे एक विमान दिल्ली विमानतळावर उतरले, ज्यामध्ये बहुतेक भारतीय जम्मू आणि काश्मीरचे होते. इस्रायल आणि इराणमधील शत्रुत्व वाढत असताना मध्यपूर्वेतील या देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. तथापी, जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनने म्हटले आहे की, 'वेळेवर हस्तक्षेप आणि पाठिंब्याबद्दल भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून आभार. परतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा आहे.'