अयोध्या राम मंदिरचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार - नृपेंद्र शर्मा यांची माहिती

श्री रामजन्मभूमी मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना प्रस्तावित प्रवेशद्वारांना इतिहासातील प्रसिद्ध आचार्यांची नावं दिली जाणार आहेत. ही नावे अद्याप ठरलेली नाहीत.

Ayodhya Ram Mandir (File Photo)

श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण समिती चे चेअरमन नृपेंद्र शर्मा (Ram Janmabhoomi Temple Construction Committee Chairman Nripendra Mishra) यांनी अयोध्येमधील श्रीराम मंदिर जून 2025 पर्यंत बांधून पूर्ण झाले असेल अशी माहिती दिली आहे. नृपेंद्र मिश्रा  यांनी शनिवारी एल अँड टी आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेडचे ​​अधिकारी आणि मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ट्रस्टच्या सूत्रांच्या मते, विविध प्रलंबित बांधकाम कामांसाठी संभाव्य मुदत निश्चित करण्यात आला आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू संतांच्या मंदिरांमध्ये पुष्करी नावाच्या तलावाचे बांधकाम सुरू आहे. 2025 जूनपर्यंत हिंदू संतांची सहा मंदिरे, एक तलाव आणि एक किलोमीटर लांबीची तटबंदी पूर्ण होईल.

याशिवाय मंदिर परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी रामनवमीपूर्वी मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या बैठकीत वरील सर्व बाबींवर बांधकाम समितीचे अध्यक्ष व बांधकाम संस्थांच्या जबाबदार लोकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

70 एकरच्या मंदिर संकुलातील 40 एकर जागा हरित क्षेत्रासाठी ठेवली जाणार आहे. यापैकी १८ एकरातील हरितिका मार्चपर्यंत तयार होईल. सप्तर्षी मंदिर पूर्ण झाल्यानंतर, मध्ये एक सुंदर पुष्करिणी (फुलांनी भरलेले तलाव) बांधले जाईल. बैठकीत उपस्थित श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त अनिल मिश्रा यांनी वरील माहिती दिली.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement