Chardham Yatra 2021: उद्यापासून चारधाम यात्रेला प्रारंभ; केदारनाथ मध्ये दररोज 800 तर बद्रीनाथ मध्ये 1200 भाविकांना दर्शनाची अनुमती
कोविड-19 चा प्रकोप कमी होत असल्याने उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी उद्यापासून (18 सप्टेंबर) चारधाम यात्रा सुरु होणार असल्याचे आज सांगितले.
कोविड-19 (Covid-19)चा प्रकोप कमी होत असल्याने उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने चारधाम यात्रा (Chardham Yatra) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी उद्यापासून (18 सप्टेंबर) चारधाम यात्रा सुरु होणार असल्याचे आज सांगितले. एक दिवस आधीच उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेवर लावलेली बंदी हटवली आणि कोविड-19 नियमांचे पालन करत यात्रा सुरु करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.
दरम्यान, यापूर्वी कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहता उत्तराखंड सरकारने एप्रिल महिन्यात चारधाम यात्रेला स्थगिती दिली होती. परंतु, चार धामांचे कपाट निर्धारीत वेळेत खुले करण्यात आले होते. तसंच पुजारी नियमितपणे पूजा-पाठही करत होते. केवळ भक्तांना प्रवेश नाकारण्यात आला होता. (Kedarnath Temple चे दरवाजे उघडले पण भाविकांसाठी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा रद्द)
ANI Tweet:
संपूर्ण देशात कोरोनाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात येत आहेत. दरम्यान, गुरुवारी यात्रेवरील बंदी उठवताना, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर. एस. चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या विभागीय खंडपीठाने सांगितले की, ही यात्रा मंदिरात येणाऱ्या भक्तांची निर्धारित संख्या यासारख्या निर्बंधांसह सुरु होईल. तसंच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोविड-नकारात्मक चाचणी अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्र आणणे बंधनकारक असेल.
त्याचबरोबर चारधाम यात्रेसाठी भाविकांची संख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. केदारनाथ धाममध्ये जास्तीत जास्त 800, बद्रीनाथमध्ये 1200, गंगोत्रीमध्ये 600 आणि 400 मध्ये यात्रेकरूंना परवानगी असेल. यमुनोत्री आणि याव्यतिरिक्त प्रवाशांना मंदिरांच्या सभोवतालच्या झऱ्यांमध्ये स्नान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. चामोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यांमध्ये चारधाम यात्रेदरम्यान आवश्यकतेनुसार पोलीस दल तैनात केले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
चारधाम यात्रेवर लाखो लोकांचे उत्पन्न अवलंबून असल्यामुळे ती सुरू करण्यासाठी राज्य सरकारवर सर्वांगीण दबाव होता. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोविड-19 संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने 28 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या चारधाम यात्रा मर्यादित पातळीवर सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र कोविडची परिस्थिती सुधारल्यास राज्याबाहेरील रहिवाशांसाठी टप्प्याटप्प्याने चारधाम यात्रा सुरू करण्याची राज्य सरकारची योजना होती.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या स्थगितीविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली होती. मात्र, नंतर ही याचिका मागे घेत, सरकारने पुन्हा एकदा उच्च न्यायालयाला चारधाम यात्रेवरील बंदी उठवण्याची विनंती केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)