बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी आणि 2 मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्स बजावले आहे. एएनआयचे ट्वीट-
शनिवारी गुजरातमध्ये 1,221 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 1.5 लाख झाली आहे. गेल्या 24 तासांत दहा मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोरोना विषाणू सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली भुवनेश्वरच्या नागरी समितीने भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांचे कार्यालय 15 दिवसांसाठी सील केले.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 25 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जच्या संघासमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एएनआयचे ट्वीट-
हिंदुराव रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व कोरोनाबाधितांना अरुणा असफ अली आणि एलएनजेपी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली आहे. एएनआयचे ट्विट-
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 11 हजार 416 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12 लाख 55 हजार 779 वर पोहचली आहे. यापैकी 40 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट-
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना नितीश कुमार, रवी शंकर प्रसाद, गिरीराज सिंग, नित्यानंद राय आणि सुशील मोदी यांनी दिघा घाटात श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध राजकीय नेत्यांनी रामविलास पासवान यांच्या निधनाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तर आज रामविलास पासवान यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तर केंद्रीय कायदा आणि विधी मंत्री रविशंकर प्रसाद हे पाटणा येथे पार पडण्याऱ्या अंत्यसंस्कारावेळी केंद्र सरकारच्या वतीने प्रतिनिधत्व करणार आहेत. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर रामविलास पासवान यांना निवासस्थाहन जर्नादन घाट येथे अंत्यसंस्कारासाठी आणले जाणार आहे.
दुसऱ्या बाजूला बिहार मध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज प्रकिया आता पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 71 जागांवर एकूण 1057 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. कोरोनाच्या काळात पार पडणाऱ्या निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास राजकीय पक्षाच्या विरोधात कारवाई केली जाईल असा इशारा ही दिला गेला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
याच दरम्यान, सध्याची देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध मार्गाने उपाय योजना केल्या जात आहेत. तर लॉकडाऊन हळूहळू उठवला जात असून विविध टप्प्यातील अनलॉकिंग नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 5 ऑक्टोंबर पासून रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्स सुरु झाले आहेत. येत्या 15 ऑक्टोंबर पासून शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र विविध राज्यातील प्रशासनाने तेथील कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास देशातील कोविड19 चा आकडा 69 लाखांच्या पार गेला आहे. तर महाराष्ट्रात 14 लाखांच्या पुढे कोरोनाग्रस्तांची संख्या आहे.