Chhattisgarh: गाय तस्करीच्या संशयावरून गुरे घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांची हत्या; रायपूरमधील घटना
गुड्डू खान आणि चांद मियाँ अशी मृतांची नावे आहेत. जखमी सद्दाम कुरेशीला नंतर रायपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. जमावाने हल्ला केल्याने चांद मियाँ आणि गुड्डू खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Chhattisgarh: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील रायपूर (Raipur) जिल्ह्यात ट्रकमधून गुरे घेऊन जाणाऱ्या तीनपैकी दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. रायपूर-महासमुंद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अरंग पोलिस स्टेशन परिसरात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. गुड्डू खान आणि चांद मियाँ अशी मृतांची नावे आहेत. जखमी सद्दाम कुरेशीला नंतर रायपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. जमावाने हल्ला केल्याने चांद मियाँ आणि गुड्डू खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांनी ट्रकचा पाठलाग केला होता. रायपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ग्रामीण) कीर्तन राठोड यांनी सांगितले की, महानदीवरील 30 फूट उंच पुलावरून तीन जण पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले तेव्हा तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. दोन जखमींना महासमुंद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. (हेही वाचा -UP Crime: भटक्या कुत्र्यांना लोखंडी रॉडने मारहाण, संतापलेल्या तरुणाकडून स्थानिकांवर हल्ला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
प्राप्त माहितीनुसार, जमावाने त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला केला आणि त्यांना पुलावरून फेकून दिले. रायपूरच्या रुग्णालयात दाखल चांद आणि सद्दामचा चुलत भाऊ शोएबने सांगितले की, जमावाने तिघांवरही हल्ला केला होता. शोएबने दावा केला की, जेव्हा तिघांवर हल्ला झाला तेव्हा त्याला चांदचा फोन आला होता. शोएबने सांगितलं की, चांदने मला सांगितले की जमावाने त्याच्यावर हल्ला केला. पण तो आणखी काही माहिती देण्याआधीच कॉल डिस्कनेक्ट झाला. मोहसीनसोबतचा दुसरा कॉल 47 मिनिटे चालला. (वाचा - कुर्ला परिसरात हल्लोखोरांची दहशत, चाकूच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू)
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल -
दरम्यान, पोलिसांनी निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार, हे तिघे महासमुंद भागातून रायपूरच्या दिशेने ट्रकमध्ये गुरे घेऊन जात असताना काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पुलावर सापडलेले वाहन जप्त करून गुरे गोठ्यात पाठवण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले. तथापी, या घटनेतील मृत झालेल्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)