Shimla Agreement: भारत-पाकिस्तानमध्ये 53 वर्षांपूर्वी झालेला शिमला करार नेमकी कशा संदर्भात होता? पाकड्यांनी हा करार रद्द केल्यामुळे काय परिणाम होणार? जाणून घ्या

2 जुलै 1972 रोजी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात शिमला करारावर स्वाक्षरी झाली.

Shimla Agreement (फोटो सौजन्य - फेसबुक)

Shimla Agreement: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत, ज्यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी-वाघा सीमा बंद करणे आणि पाकिस्तानी दूतावासातून लष्करी अधिकाऱ्यांना परत बोलावणे असे निर्णय समाविष्ट आहेत. भारताच्या या राजनैतिक हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता, याला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने 1972 चा शिमला करार (Shimla Agreement) रद्द करण्याची घोषणा केली आहे. 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला शिमला करार काय आहे ते जाणून घेऊया?

शिमला करार काय आहे?

2 जुलै 1972 रोजी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात शिमला करारावर स्वाक्षरी झाली. 1971 च्या युद्धानंतर हा करार झाला, ज्यामध्ये भारताचा निर्णायक विजय झाला आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र बनले. या युद्धात हजारो पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली आणि भारताने सुमारे 5 हजार चौरस मैलांचा प्रदेश ताब्यात घेतला. शिमला करारांतर्गत, दोन्ही देशांनी शांततापूर्ण संवाद कायम ठेवण्याचे, सीमेवर यथास्थिती राखण्याचे आणि परस्पर संमतीने कोणताही वाद सोडवण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: भारताच्या कृतीने पाकिस्तान संतप्त! हवाई क्षेत्र बंद करत शिमला करार रद्द करण्याची दिली धमकी)

शिमला कराराचा इतिहास -

यापूर्वी शिमला कराराचे अनेक वेळा उल्लंघन झाले आहे, विशेषतः 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान, जेव्हा पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. आता पाकिस्तानने अधिकृतपणे हा करार स्थगित केला आहे. भारताने अलिकडेच घेतलेल्या निर्णयांना प्रतिसाद म्हणून पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये नवीन कटुता निर्माण होण्याची सुरुवात होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांची माहिती देणार्‍यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर)

भारत-पाकिस्तान संबंध -

दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा अतिशय नाजूक टप्प्यावर उभे आहेत. एकीकडे भारताने दहशतवादी हल्ल्यांबाबत कडक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानने धोरणात्मक आणि राजनैतिक पातळीवर जुना करार मोडला आहे. आता दोन्ही देश नवीन कराराकडे वाटचाल करतील का? की हा तणाव आणखी वाढेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement