Imran Khan यांनी व्यक्त केली PM Narendra Modi यांच्यासोबत टीव्हीवर डिबेट करण्याची इच्छा; भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठीचा प्रयत्न 

चर्चेतून हा प्रश्न सोडवता आला तर भारत आणि पाकिस्तानच्या जनतेसाठी ते फायदेशीर ठरेल, असे खान म्हणाले. मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांनी भारतावर आरोप केला की त्यांनी वाटाघाटीसाठी पुढाकार घेतला असूनही भारत सरकारने त्याला कोणतेही सकारात्मक उत्तर दिले नाही

इम्रान खान आणि पीएम मोदी (Photo Credit-IANS)

गेले अनेक वर्षे भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात तणावपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारही गेले काही महिने पूर्णतः बंद आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी मंगळवारी भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला. भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाक पंतप्रधानांशी टेलिव्हिजनवर चर्चा करावी, असे या ठरावात म्हटले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याच्या पूर्वसंध्येला इम्रान खान यांनी रशिया टुडेला सांगितले की, ‘मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर डिबेट करायला आवडेल.’

चर्चेतून हा प्रश्न सोडवता आला तर भारत आणि पाकिस्तानच्या जनतेसाठी ते फायदेशीर ठरेल, असे खान म्हणाले. मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांनी भारतावर आरोप केला की त्यांनी वाटाघाटीसाठी पुढाकार घेतला असूनही भारत सरकारने त्याला कोणतेही सकारात्मक उत्तर दिले नाही.

ते पुढे म्हणाले की, ‘भारत आता अतिरेकी विचारसरणीने व्यापला आहे. ज्यावेळी माझा पक्ष 2018 मध्ये सत्तेत आला, तेव्हा मी भारताकडे हात पुढे केला होता. आपण एकत्र बसून काश्मीर प्रश्नावर चर्चा करू आणि हा प्रश्न सोडवू, असा प्रस्ताव मी मांडला होता. मी भारतासोबत जवळपास 10 वर्षे क्रिकेट खेळलो आहे, परंतु जेव्हा मी भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला, तेव्हा तो मला माहिती असलेला भारत असल्याचे मला जाणवले नाही. मला वाटले की हा मला माहीत असलेला भारत नाही.’

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलेल्या या प्रस्तावावर भारताकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, अशी कोणतीही मागणी मान्य करण्यापूर्वी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ला, पठाणकोट, उरी आणि पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा देण्याची मागणी भारत करू शकतो, असे मानले जाते. अशा या हल्ल्यांनंतरच भारताने आतापर्यंत पाकिस्तानवर दोनदा सर्जिकल स्ट्राइक केले आहेत. (हेही वाचा: India's Help To Afghanistan: अफगाणिस्तानच्या मदतीसाठी भारत पुढे आला, आज पाकिस्तानमार्गे 50 हजार मेट्रिक टन गहू पाठवणार आहे)

दरम्यान, भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध अजून बिघडले आहेत. याआधीही काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये तीन युद्धे झाली आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now