Landslide In Brazil: ब्राझीलमध्ये भीषण पाऊस आणि भूस्खलन; 37 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

बचाव आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी 626 सैन्यासह 12 विमाने, 45 वाहने आणि 12 बोटी तैनात करण्यात आले आहे. रस्ते मोकळे करणे, अन्न, पाणी आणि गाद्या यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचे वितरण आणि विस्थापितांसाठी निवारा उभारणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Heavy rains in Brazil (PC - X/@upuknews1)

Landslide In Brazil: ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) आणि भूस्खलन (Landslide) होत आहे. हे भूस्खलन आणि पाऊस आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी ठरलं आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, या आपत्तीमुळे मृतांची संख्या 37 वर पोहोचली असून 74 लोक बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.

राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता -

राज्यात पाऊस आणि भूस्खलनामुळे लोकांची झोप उडाली आहे. कोसळलेली घरे, पूल आणि रस्त्यांच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या वाचलेल्यांना शोधण्यासाठी आपत्कालीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिस्थिती पाहता गव्हर्नर एडुआर्डो लेइट यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. (हेही वाचा - ‘Harry Potter’s Castle’ Destroyed: रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात हॅरी पॉटर कॅस्टल उद्ध्वस्त, पाच जणांचा मृत्यू)

गव्हर्नर एडुआर्डो लेइट यांनी सांगितलं की, 'आम्ही आमच्या इतिहासातील सर्वात भीषण आपत्तीचा सामना करत आहोत. बचावकार्य चालू आहे पण मृतांचा आकडा वाढू शकतो असे खेदाने म्हणावे लागेल. राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी प्रभावित क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे आणि हवामानाच्या तीव्र परिस्थितीमुळे उद्भवलेल्या समस्या कमी करण्यासाठी मानवी किंवा भौतिक संसाधनांची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

बचाव आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी 626 सैन्यासह 12 विमाने, 45 वाहने आणि 12 बोटी तैनात करण्यात आले आहे. रस्ते मोकळे करणे, अन्न, पाणी आणि गाद्या यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचे वितरण आणि विस्थापितांसाठी निवारा उभारणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, राज्याची मुख्य नदी गुआइबा चिंताजनक पातळी गाठण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते. अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी धोक्याचा इशारा जारी केला आहे. पावसामुळे अनेक समाजाशी संपर्क तुटला असून जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिस्थिती पाहता लोकांना धोका जास्त असलेल्या जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement