आता अवघ्या 2 दिवसात पोर्ट होणार तुमचा मोबाईल क्रमांक, 16 डिसेंबर पासून नवे नियम लागू

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी नवे नियम लवकरच लागू करणार आहे. या नियमांची घोषणा सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. मात्र आता हे नियम 16 डिसेंबर पासून लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी नवे नियम लवकरच लागू करणार आहे. या नियमांची घोषणा सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. मात्र आता हे नियम 16 डिसेंबर पासून लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्राय यांचे असे म्हणणे आहे की, टेस्टिंग प्रोसेससाठीच खुप वेळ लागला, कारण पुढे जाऊन याबाबत कोणतीही समस्या उद्भवणार नाही. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी फक्त 2 दिवस लागणार आहेत. युजर्सला या दोन दिवसात क्रमांक एका ऑपरेटर मधून दुसऱ्या ऑपरेटर मध्ये पोर्ट करता येणार आहे.

जर तुम्ही तुमचा क्रमांक एका सर्कल मधून दुसऱ्या सर्कल मध्ये पोर्ट करु इच्छिता तर त्यासाठी नवे नियम लागू झाल्यानंतर 5 दिवस लागणार आहेत. यापूर्वी हे नियम 11 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार होते. मात्र आता हे नवे नियम 16 डिसेंबर पासूनच लागू होणार आहे.(5G च्या येण्याने बदलणार जग; पाहायला मिळणार 'हे' नवे बदल)

 नियम लागू करण्यासाठी लागेल्या वेळेसाठी स्पष्टीकरण देत ट्रायने म्हटले आहे की, टेस्टिंग प्रोसेस मध्ये वेळ लागल्याने नियम लागू करण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे नियम लागू झाल्यानंतर युजर्सला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हा विचार करण्यात आला आहे. मोबाईल युजर्स त्यांच्या सिमकार्डच्या कंपनीचे बदलते रिचार्ज प्लॅन, सर्विस किंवा नेटवर्क बाबत नाखुश होऊन क्रमांक पोर्ट करतात. मात्र क्रमांक पोर्ट करण्यासाठी सध्या 7-8 दिवस लागतात. परंतु नवे नियम लागू झाल्यानंतर क्रमांक फक्त दोन दिवसांत पोर्ट होणार आहे.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement