Today's Googly: एका षटकात सहा सिक्सर मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण? क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये विक्रम नोंदवलेल्या खेळाडूविषयी जाणून घ्या

रवी शास्त्री हे भारतातील पहिले क्रिकेटपटू आहेतय ज्यांनी एका षटकात सहा षटकार मारले. त्यांनी 1985 मध्ये रणजी ट्रॉफी सामन्यात ही कामगिरी केली. त्यांच्या नंतर युवराज सिंग, सागर मिश्रा आणि रियान पराग यांनीही हा विक्रम केला आहे.

Who was the first Indian cricketer to hit a sixer?: क्रिकेटमध्ये फलंदाजाने षटकार मारणे हा सर्वात उत्साहाचा आणि रोमांचक क्षण असतो. विशेषतः जेव्हा एखादा फलंदाज एकाच षटकात सलग सहा षटकार मारतो तेव्हा ते क्रीडाप्रेमींसाठी स्वप्नासारखे असते. टी 20 क्रिकेट आल्यानंतर, हा विक्रम आणखी सामान्य झाला आहे. परंतु इतिहासात असे फलंदाज ही आहेत ज्यांनी टी 20 सुरू होण्या आधीपासून ही कामगिरी केली होती. तर प्रश्न असा आहे की, एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण होता? त्याचे उत्तर आहे रवी शास्त्री (Ravi Shastri).

षटकार मारण्याचे कौशल्य

षटकार मारणे ही केवळ नशिबाची बाब नाही, तर फलंदाजे कौशल्य, त्याची रणनीती आणि योग्य वेळेची त्यात मोठी भूमिका आहे. एकदा षटकार मारणे सोपे असू शकते. परंतु सलग सहा षटकार मारणे आश्चर्यकारक आहे. जगभरातील एकूण 11 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. यातील पहिला विक्रम 1968 मध्ये झाला होता. पण भारतात सर्वात जास्त चर्चेत आलेली घटना म्हणजे 2007 च्या आयसीसी टी 20 विश्वचषकात युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर सहा षटकार मारले होते. पण मनोरंजक गोष्ट म्हणजे युवराज सिंग हा हा पराक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज नव्हता.

पहिला भारतीय कोण होता?

एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री होते. ही घटना 1985 मध्ये मुंबई (तेव्हाची बॉम्बे) बडोद्याविरुद्ध खेळत असताना रणजी ट्रॉफी सामन्यात घडली. शास्त्रींनी वानखेडे स्टेडियमवर फिरकी गोलंदाज तिलक राजच्या चेंडूवर सलग सहा षटकार मारले आणि एका षटकात 36 धावा केल्या. देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ होती. या डावात शास्त्रींनी 123 चेंडूत 200 धावा केल्या. जे त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक होते.

या नंतर कोणी ही विक्रम केला?

रवी शास्त्रींनंतर युवराज सिंगने 2007 मध्ये टी20 विश्वचषकात हा विक्रम केला. याशिवाय 2016 मध्ये रेल्वेसाठी बी डिव्हिजन शिल्ड सामन्यात सागर मिश्रानेही हा पराक्रम केला.

अलीकडेच, आयपीएल 2025 मध्ये, रियान परागनेही सलग सहा षटकार मारले, ज्यामध्ये पहिले चार षटकार मोईन अलीच्या चेंडूवर आणि उर्वरित दोन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर आले.

गुगलचा नवीन गेम - "गुगली"

गुगलने अलीकडेच "गुगलवर गुगली" नावाचा एक नवीन गेम लाँच केला आहे. हा गेम क्रिकेटशी संबंधित आहे. ज्यामध्ये प्रश्न वरवरून सोपे दिसतात, परंतु उत्तर थोडे गोंधळात टाकणारे आहे. खूप विचार करायला लावणारे आहेत. म्हणूनच याला 'गुगली' असे नाव देण्यात आले आहे. क्रिकेटच्या क्षेत्रात गुगली म्हणजे फलंदाजा चकवा देणारी गोलंदाजी. ही एक खास गोलंदाजी शैली आहे.

तर, जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला भारतीय कोण होता? तर उत्तर आहे रवी शास्त्री. रवी शास्त्रीनी 1985 मध्ये हा विक्रम केला. त्यानंतर युवराज सिंग, सागर मिश्रा आणि रियान पराग सारख्या फलंदाजांनीही हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

क्रिकेट चाहत्यांसाठी, जेव्हा एखादा फलंदाज एकाच षटकात सलग षटकार मारतो तेव्हा क्षण तो नेहमीच एक अविस्मरणीय असतो. हा विक्रम करणारे क्रिकेटपटू त्यांना ही वेगळ महत्व प्राप्त होत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement