ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकात 'हे' 3 फलंदाज गोलंदाजांचे जगणे करू शकतात कठीण, वीरेंद्र सेहवागने सांगितले नावे

वीरेंद्र सेहवागने असेही सांगितले की, 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. वीरेंद्र सेहवागने विश्वचषकाची भविष्यवाणी केली आणि भारतीय भूमीवर होणाऱ्या विश्वचषकात धावा करू शकतील अशा खेळाडूंबद्दल सांगितले.

Virender Sehwag, Virat, Rohit (Photo credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आयसीसीने 27 जूनला वेळापत्रकही जाहीर (ODI World Cup Schedule Announced) केले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर टीम इंडियाचा स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सर्वाधिक धावसंख्येबाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. वीरेंद्र सेहवागने असेही सांगितले की, 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. वीरेंद्र सेहवागने विश्वचषकाची भविष्यवाणी केली आणि भारतीय भूमीवर होणाऱ्या विश्वचषकात धावा करू शकतील अशा खेळाडूंबद्दल सांगितले. सेहवागने टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरचे नाव घेतले आहे. सेहवागच्या मते, हे तीन दिग्गज खेळाडू या विश्वचषकात गोलंदाजांचे जगणे कठीण करू शकतात.

रोहितने गेल्या एकदिवसीय विश्वचषकात केला होता कहर

टीम इंडियाचा कर्णधार या वर्ल्ड कपमध्ये चमत्कार करू शकतो. गेल्या विश्वचषकात त्याने बॅटने कहर केला होता. रोहितने स्पर्धेत चांगली फलंदाजी करताना 9 सामन्यात 81 च्या सरासरीने 648 धावा केल्या होत्या. यादरम्यान हिटमॅनच्या बॅटमधून 5 शतके झळकली होती आणि त्याने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले होते. यावेळी जर त्याच्या बॅटने काम केले तर टीम इंडिया तिसरा वर्ल्ड कप जिंकू शकेल. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023 Ticket Price: विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच क्रिकेट रसिक ऑनलाइन तिकिट पाहण्यात मग्न, किती असेल तिकिटांची किंमत? येथे जाणून घ्या संपूर्ण तपशील)

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी होणार भिडत

विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडिया 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईच्या या मैदानावर कांगारू संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. चिदंबरममध्ये खेळल्या गेलेल्या 6 पैकी 5 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयाची चव चाखली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासमोर आव्हान असेल.

गेल्या विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणारे शीर्ष पाच खेळाडू

रोहित शर्मा (भारत) - 648 धावा

डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 647 धावा

शकीब अल हसन (बांगलादेश) 606 धावा

केन विल्यमसन (न्यूझीलंड) 578 धावा

जो रूट (इंग्लंड) 556 धावा

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now