Team India New Coach: टीम इंडिया मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी राहुल द्रविडने उचललं एक पाऊल, क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी ‘हे’ नाव पुढे

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळणार असून त्याची घोषणा लवकरच होऊ शकते. सर्व अटकळां दरम्यान अखेर भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे समजले जात आहे. दुसरीकडे, भारताचा माजी यष्टिरक्षक अजय रात्रा यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे.

राहुल द्रविड आणि पृथ्वी शॉ (Photo Credit: Instagram/PrithviShaw)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) नवा प्रशिक्षक मिळणार असून त्याची घोषणा लवकरच होऊ शकते. सर्व अटकळांदरम्यान अखेर भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने (Rahul Dravid) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे समजले जात आहे. मंगळवारी द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अधिकृतपणे अर्ज केल्याची माहिती बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने दिली आहे. आज प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच द्रविडची यूएईमध्ये भेट घेतली होती, जिथे सौरव गांगुली, जय शाह आणि इतरांनी प्रशिक्षकपदासाठी द्रविडशी चर्चा केली. “आज शेवटचा दिवस असल्याने राहुलने औपचारिकपणे अर्ज केला आहे. NCA मधील त्याचा संघ, गोलंदाजी प्रशिक्षक पारस (म्हांब्रे) आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय (शर्मा) यांनी आधीच अर्ज केला आहे. त्याचा अर्ज ही केवळ औपचारिकता होती,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी पीटीआयला सांगितले. (Team India New Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक प्रकरणात नवीन ट्विस्ट, राहुल द्रविडच्या नियुक्तीवर BCCI प्रमुख सौरव गांगुलीचा खुलासा)

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सध्याचे प्रमुख द्रविडने अर्ज केल्यामुळे, क्रिकेट सल्लागार समितीचे काम सोपे झाले आहे कारण महान फलंदाजाची बरोबरी करणारे दुसरे कोणतेही मोठे नाव शर्यतीत नाही आहे. तसेच, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची पहिली व एकमेव निवड असल्याचे विश्वसनीयरित्या समजले जात आहे. द्रविडच्या निरीक्षणात न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेने भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन पर्व सुरू होईल जिथे नवीन टी-20 कर्णधाराला संघाची सूत्रे दिले जातील, जो बहुधा रोहित शर्मा असेल. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या मोहिमेच्या शेवटी रवि शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. दुसरीकडे, भारताचा माजी यष्टिरक्षक अजय रात्रा यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याला दुजोरा दिला आहे.

फरीदाबादमध्ये जन्मलेले 39 वर्षीय रात्रा यांनी 6 कसोटी आणि 12 वनडे सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या माजी खेळाडूला कोचिंगचा चांगला अनुभव आहे. ते सध्या आसामचे मुख्य प्रशिक्षक आहेत. अजय रात्रा यांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स सोबत काम केले आहे आणि भारतीय महिला संघाशी देखील संबंधित आहे. अजय रात्राशिवाय अभय शर्मानेही क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे, त्यामुळे द्रविड मुख्य प्रशिक्षक बनल्यास आपल्या संघासाठी कोणाची निवड करतो हे पाहावे लागेल. बॉलिंग कोचबद्दल बोलायचे झाले तर पारस म्हाबरे टीम इंडियाचे पुढचे बॉलिंग कोच होऊ शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now