IND Beat BAN 2nd Match Scorecard: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने फोडला विजयाचा 'नारळ', बांगलादेशचा 6 विकेटने केला पराभव; गिलचे शानदार शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 4 विकेट गमावून 46.3 षटकात विजय मिळवला.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा सामना आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs BAN) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium, Dubai) खेळला गेला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 4 विकेट गमावून 46.3 षटकात विजय मिळवला.
मोहम्मद शमीने घेतल्या पाच विकेट
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात वाईट झाली. त्यांनी फक्त 35 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर तौहिद हृदयॉयचे शतक आणि झाकीर अलीच्या अर्धशतकाने संघाचा सन्मान वाचवला. तौहीदने 100 धावा आणि झाकीरने 68 धावा केल्या. बांगलादेशचा स्कोर 10 विकेट गमावून 228 धावांपर्यत पोहचवला. दुसरीकडे, भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणाने तीन विकेट्स घेतल्या. आणि अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Rohit Sharma Milestone: रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय)
शुभमन गिलचे शानदार शतक
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि फक्त 59 चेंडूत 69 धावा केल्या. टीम इंडियाने 46.3 षटकांत फक्त चार विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी उपकर्णधार शुभमन गिलने नाबाद 101 धावांची सर्वात स्फोटक खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान शुभमन गिलने 129 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. शुभमन गिल व्यतिरिक्त केएल राहुलने नाबाद 41 धावा केल्या.
पुढचा पुढील सामना पाकिस्तासोबत
त्याच वेळी, स्टार गोलंदाज तस्किन अहमदने बांगलादेश संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. रियाद हुसेन व्यतिरिक्त मुस्तफिजूर रहमान आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाचा पुढील सामना रविवारी म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी होईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)