T20 World Cup 2021: पाकिस्तानकडून टीम इंडियाची वर्ल्ड कप विजयी मालिका खंडित, लज्जास्पद पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया, पहा काय म्हणाला

पाकिस्तानने रविवारी नवा इतिहास रचला. बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने टी-20 विश्वचषक 2021 च्या शानदार सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार कोहलीच्या चेहऱ्यावर नैराश्य आणि दबाव स्पष्ट दिसत होता. कर्णधार कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावले पण ते संघासाठी अपुरे ठरले.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

पाकिस्तानने (Pakistan) रविवारी नवा इतिहास रचला. बाबर आजमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तान संघाने टी-20 विश्वचषक 2021 च्या शानदार सामन्यात भारताचा (India) 10 गडी राखून पराभव केला. आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. सामन्यात पहिले फलंदाजी करताना भारताने दुबईच्या  (Dubai) मैदानावर 152 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान सलामीवीरांनी कोणतीही विकेट न गमावता 17.5 षटकांत विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खूपच निराश दिसला. भारतीय संघाच्या या पराभवामुळे विराट कोहली आता ICC विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना हरणारा 29 वर्षांतील पहिला कर्णधार बनला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अनेक पिढ्यांनी या विजयाची वाट पाहिली होती आणि आता त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या पराभवानंतर कर्णधार कोहलीच्या चेहऱ्यावर नैराश्य आणि दबाव स्पष्ट दिसत होता. कर्णधार कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावले पण ते संघासाठी अपुरे ठरले. (T20 World Cup 2021, IND vs PAK: टी20 विश्वचषकाच्या सामन्यात भारतावर पाकिस्तानचा विजय, टीम इंडियाला 'या' चुका पडल्या महागात)

“आम्ही योग्यरित्या कार्यान्वित केले नाही. श्रेय जेथे देय आहे आणि पाकिस्तानने आज आम्हाला पराभूत केले. त्यांनी चेंडूने शानदार सुरुवात केली आणि 20 धावांवर 3 विकेट्स ही चांगली सुरुवात नव्हती. आम्हाला लवकर विकेट्सची गरज होती, पण फलंदाजीमुळे त्यांनी आम्हाला अजिबात संधी दिली नाही,” कोहलीने सामना संपल्यानंतर होस्ट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सला सांगितले. “पहिल्या हाफमध्ये खेळपट्टी संथ होती आणि 10 षटकांपर्यंत दुसऱ्या सहामाहीत लाईनमधून फटके मारणे इतके सोपे नव्हते. आम्हाला त्या 15-20 अतिरिक्त धावा हव्या होत्या आणि त्यासाठी आम्हाला एका चांगल्या सुरुवातीची गरज होती, परंतु पाकिस्तान गोलंदाजीने आम्हाला त्या अतिरिक्त धावा करू करू दिल्या नाही,” तो पुढे म्हणाला.

दरम्यान, भारताने 10 विकेटने टी-20 हरण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच योगायोगाने पाकिस्तानने पहिल्यांदाच टी-20 मध्ये 10 गडी राखून विजय मिळवला आहे. “आम्ही दुसऱ्या धीम्या गोलंदाजाला घेण्याचा युक्तिवाद करू शकतो, पण तयार राहणे आणि आपली ताकद समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण दवने हळू गोलंदाज प्रभावी होऊ शकत नाहीत. हा स्पर्धेचा फक्त पहिला गेम आहे, शेवटचा नाही,” कोहली म्हणाला. दरम्यान आयसीसी स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवण्याची ही पहिलीच वेळ नाही, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि कोहली या तिघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी (2004, 2009 आणि 2017) मध्ये कर्णधार म्हणून प्रत्येकी एक सामना गमावला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement