On This Day in 2002: आजच्या दिवशी दिसली टीम इंडियाची 'दादागिरी', सौरव गांगुलीने 18 वर्षांपूर्वी लॉर्ड्स येथे आपली जर्सी हवेत भिरकावून साजरा केला नेटवेस्ट मालिकेचा अविस्मरणीय विजय

13 जुलै 2002 रोजी त्यांच्याच भूमीवर इंग्लंडला हरवून टीम इंडियाने पहिल्यांदा नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने जर्सी काढून हवेत भिरकावून विजय साजरा करणारा तो क्षण भारतीय क्रिकेटमधील आजही सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी आहे. गांगुलीने आपली जर्सी काढून अँड्र्यू फ्लिंटॉफला प्रत्युत्तर दिले होते.

मोहम्मद कैफ, झहीर खान आणि सौरव गांगुली (Photo Credit: Getty/VideoScreeGrab)

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. 13 जुलै 2002 रोजी त्यांच्याच भूमीवर इंग्लंडला (England) हरवून टीम इंडियाने (Team India) पहिल्यांदा नेटवेस्ट ट्रॉफी (NatWest Trophy) जिंकली. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला आधुनिक भारतीय संघाचा शिल्पकार आणि विजयाचा सिकंदर मानले जाते. गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघानेही अत्यंत रोमांचक सामन्यात यजमान टीमकडून पराभवाचा बदला घेतला. जेव्हा गांगुलीच्या कर्णधारपदाचा उल्लेख केला जातो तेव्हा 2001 ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटी आणि 2002 इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सचा (Lords) अंतिम सामना निश्चितच आठवला जातो. या दोन्ही सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर करणाऱ्या टीम इंडियाने विजय मिळविला होता. क्रिकेटची पांढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने 2 विकेट आणि 3 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ भारताच्या विजयाचे शिल्पकार होते. ('फक्त ग्रेग चॅपेलला दोष देऊ शकत नाही', 15 वर्षानंतर सौरव गांगुली यांनी भारतीय संघातून वगळण्याबाबत केला धक्कादायक खुलासा)

सलामी फलंदाज मार्कस ट्रेस्‍कॉथिकच्या 109 आणि कर्णधार नासिर हुसैनच्या 115 धावांच्या शानदार डावामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावून 325 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 3 चेंडू शिल्लक असताना 8 विकेट गमावून 326 धावा केल्या आणि सामन्यासह विजेतेपद जिंकले. भारताकडून कर्णधार गांगुलीने 60, कैफने नाबाद 87 आणि युवराजने 69 धावा केल्या. कैफच्या कारकीर्दीतील हा सर्वात अविस्मरणीय डाव राहिला. जेव्हा त्याने 2018 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो जाहीर करण्यासाठी त्याने 13 जुलैची तारीख निवडली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने लिहिले की, "नेटवेस्ट ट्रॉफीमधील विजयाला 16 वर्षे झाली आणि आज मी निवृत्त होत आहे. भारताकडून खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी बोर्डाचे आभारी आहे."

या विजयानंतर दादाने जर्सी काढून हवेत भिरकावून विजय साजरा करणारा तो क्षण भारतीय क्रिकेटमधील आजही सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी आहे. गांगुलीने आपली जर्सी काढून अँड्र्यू फ्लिंटॉफला प्रत्युत्तर दिले होते. त्याचवर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध वनडे सामना जिंकल्यावर फ्लिंटॉफने आपली जर्सी हवेत भिरकावली होती. या विजयासह मालिका 3-3 ने ड्रॉ झाली. फ्लिंटॉफच्या त्या आक्रमणाला प्रत्युत्तर देत गांगुलीने टी-शर्ट काढला होता असे मानले जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement