Melbourne Weather Report Updates: मेलबर्नमध्ये पावसामुळे सामना वाहून जाण्याची शक्यता, जाणून घ्या काय आहे हवामान अहवाल

मेलबर्नचे हवामान काही तासांतच बदलते. त्यामुळेच सायंकाळी पावसाची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या सामन्याच्या निकालासाठी 90 मिनिटे अतिरिक्त दिली आहेत.

PAK vs ENG (Photo Credit - Twitter)

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळवला जाणार आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार सकाळी 10) हवामान स्वच्छ दिसून आले. अशा स्थितीत टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगण्याची पूर्ण शक्यता आहे, मात्र संध्याकाळी पावसाची शक्यता नक्कीच आहे. मेलबर्नचे हवामान काही तासांतच बदलते. त्यामुळेच सायंकाळी पावसाची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या सामन्याच्या निकालासाठी 90 मिनिटे अतिरिक्त दिली आहेत. दीड तासानंतरही सामना सुरू झाला तरी सामना 20-20 षटकांचा असेल, तर मधल्या षटकांमध्ये पाऊस पडला तरी सामना पूर्ण होईल.

 

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस

स्थानिक वेळेनुसार, सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल तर भारतीय वेळेनुसार हा सामना 1.30ला सुरु होईल आणि त्याच वेळी पावसाची 52 टक्के शक्यता आहे. AccuWeather च्या अहवालात असे म्हटले आहे. पुढील दीड तास हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज असला तरी 9 वाजता पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तो 59 टक्के आहे, पण चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने दिवसभरासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच आज जेवढा सामना खेळवला जाईल त्याच षटकापासुन सामना सोमवारी सुरु होईल. (हे देखील वाचा: PAK vs ENG, Final T20 Live Streaming Online: फायनलमध्ये पाकिस्तान- इंग्लंड आमने-सामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)

 

विश्वकपमधील दोन्ही संघांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला

या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानचा संघ तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 2007 मध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध हरला होता. त्याचबरोबर 2009 मध्ये श्रीलंकेला हरवून त्यांनी विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर ते तिसऱ्यांदा फायनलही खेळणार आहे. 2010 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्याचवेळी, 2016 मध्ये त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वकपमधील दोन्ही संघांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. या विश्वचषकात दोन्ही संघांना उपांत्य फेरीपर्यंत खेळणे कठीण वाटत होते. पण आज दोन्ही संघ अंतिम फेरीत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now