IPL 2025 Closing Ceremony: आयपीएल 2025 चा समारोप समारंभ होणार 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाने; कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार लाईव्ह शो?
मिळालेल्या वृत्तानुसार, या समारोप समारंभात 'ऑपरेशन सिंदूर' साठी (Opration Sindoor) भारतीय सशस्त्र दलांना आदरांजली वाहण्यात येईल. BCCI चे सचिव देवजीत साकिया यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, आयपीएल 2025 च्या समारोप समारंभात भारतीय लष्कराचा सन्मान केला जाईल.
IPL 2025 Closing Ceremony And Operation Sindoor: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2025 चा समारोप समारंभ आयोजित केला आहे. आयपीएल 2025 च्या या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे यावेळी भारतीय लष्कराचा समारोप समारंभात बीसीसीआयकडून (BCCI) सन्मान केला जाईल. मिळालेल्या वृत्तानुसार, या समारोप समारंभात 'ऑपरेशन सिंदूर' साठी (Opration Sindoor) भारतीय सशस्त्र दलांना आदरांजली वाहण्यात येईल. BCCI चे सचिव देवजीत साकिया यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, आयपीएल 2025 च्या समारोप समारंभात भारतीय लष्कराचा सन्मान केला जाईल.
IPL 2025 के फाइनल मैच में मनाया जायेगा Opration Sindoor की जीत का जश्न...#IPL2025 #IPLFinal #OprationSindoor #IndianArmy #IndianCricket #LatestNews #Nedricknews pic.twitter.com/WLi2L9t1sZ
— Nedrick News (@nedricknews) May 27, 2025
वृत्तानुसार, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल दलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. (हे देखील वाचा:
आयपीएलचा समारोप समारंभ कधी आणि कुठे होणार?
आयपीएल 2025 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. याच मैदानावर सामन्यापूर्वी समारोप समारंभ आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात लष्करी बँड सादर करू शकतात. यासोबतच, लोकप्रिय गायकांनाही सादरीकरणासाठी बोलावले जाऊ शकते, जसे श्रेया घोषालने आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभात सादरीकरण केले होते. त्याचप्रमाणे, समारोप समारंभात संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाऊ शकते.
बीसीसीआयकडून भारतीय सैन्याचा सन्मान
बीसीसीआयकडून भारतीय सैन्याचा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही लष्करी बँडने आयपीएल उद्घाटन समारंभात सादरीकरण केले होते. त्या वर्षी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सशस्त्र दलांच्या वैयक्तिक कल्याणासाठी 20 कोटी रुपये दिले. त्या काळात, भारतीय सैन्यावर पुलवामा हल्ला झाला होता, ज्यामध्ये 44 सैनिक शहीद झाले होते. तरीही बीसीसीआयने त्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2025 10:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

