IND vs PAK: "हे तर खूपच अपमानकारक!" भारताने ट्रॉफी नाकारली, पीसीबी अध्यक्षांची झाली फजिती, पाहा काय घडलं

दुबईमध्ये झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. भारतीय खेळाडूंनी मैदानावर दमदार कामगिरी दाखवली, पण सामन्यानंतर झालेल्या ट्रॉफी वितरण सोहळ्याने क्रिकेट जगताला धक्का बसला.

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. आणि जेव्हा तो सामना आशिया कपची अंतिम फेरी असेल, तेव्हा तो रोमांच शिगेला पोहोचतो. दुबईमध्ये झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. भारतीय खेळाडूंनी मैदानावर दमदार कामगिरी दाखवली, पण सामन्यानंतर झालेल्या ट्रॉफी वितरण सोहळ्याने क्रिकेट जगताला धक्का बसला. Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचे मोठे मन; आशिया कपची मॅच फी भारतीय सैन्य आणि पहलगाम पीडितांना दान

भारतीय खेळाडूंचा ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

खरं तर, भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. यामुळे ट्रॉफी वितरण समारंभ जवळपास दोन तास उशिरा झाला. नक्वी भारतीय संघाची वाट पाहत स्टेजवर उभे राहिले, पण एकही खेळाडू त्यांच्याकडे ट्रॉफी घेण्यासाठी आला नाही. नक्वी बराच वेळ वाट बघत होते, त्यानंतर कोणीतरी ट्रॉफी ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेले. दरम्यान, सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी संघही ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला नाही. अखेरीस, नक्वी एकटेच उभे होते आणि त्यांना अत्यंत लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी संघ बाहेर पडल्यावर भारतीय चाहत्यांनी "भारत, भारत!" अशी जोरदार घोषणाबाजी केली.

टीम इंडियाचा जोरदार जल्लोष

हा सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचा उत्साह कमी झाला नाही. कर्णधार हार्दिक पंड्या हा खेळकर अंदाजात ट्रॉफीकडे चालत गेला, ज्यामुळे संपूर्ण संघात हशा पिकला. खेळाडूंनी मैदानावर नाचून आणि गाऊन विजयाचा जोरदार आनंद साजरा केला.

भारताने पाकिस्तानला दाखवला 'आरसा'

या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही किंवा मोहसीन नक्वी यांच्याशी कोणतीही औपचारिकता पाळली नाही. ही भूमिका त्यांनी आधीच ठरवलेली होती. कारण या स्पर्धेत याआधी झालेल्या दोन्ही भारत-पाकिस्तान सामन्यांनंतरही भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करणे टाळले होते. भारताने केवळ अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप जिंकला नाही, तर पाकिस्तानला त्यांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल एक प्रकारे 'आरसा' दाखवून दिला. यामुळे पाकिस्तानी संघाला पराभवासह ट्रॉफी वितरण सोहळ्यात प्रचंड मानहानी सहन करावी लागली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement