IND vs AUS 1st ODI: केएल राहुल ने डेविड वॉर्नर चा कॅच सोडल्यावर वानखेडेवरील चाहत्यांनी केला 'धोनी...धोनी' नावाचा जयघोष, पाहा Video
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याच्या कनकशनमुळे कर्णधार विराट कोहली याने विकेटकीपिंगची जबाबदारी केएल राहुल याच्याकडे सोपविली. सुरुवातीला राहुलने चांगली विकेटकीपिंग केली, पण ऑस्ट्रेलियन डावाच्या 24 व्या ओव्हरमध्ये राहुलने एक संधी गमावली ज्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षकांनी धोनी-धोनीच्या नावाची घोषणा सुरू केली.
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या कनकशनमुळे कर्णधार विराट कोहली याने विकेटकीपिंगची जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे सोपविली. सुरुवातीला राहुलने चांगली विकेटकीपिंग केली, पण ऑस्ट्रेलियन डावाच्या 24 व्या ओव्हरमध्ये राहुलने एक संधी गमावली ज्यानंतर त्याला चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. सामन्यात भारतीय संघाचा टॉप ऑर्डर फलंदाज राहुलने तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केली. कर्णधार कोहलीच्या जागी त्याने फलंदाजी करताना 47 धावा केल्या. जेव्हा उर्वरित फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करू शकले नाही तेव्हा राहुल क्रीजवर उभा राहिला. यासाठी त्याचे कौतुकही झाले. फलंदाजीनंतर त्याने विकेटकीपिंगही हाताळली. मात्र, विकेटकीपिंग करताना त्याच्याकडून चूक झाली, ज्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षकांनी धोनी-धोनीच्या नावाची घोषणा सुरू केली. (IND vs AUS 1st ODI 2020: रिषभ पंत ऐवजी केएल राहुल याने सांभाळली ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेटकिपिंगची जबाबदारी, जाणून घ्या कारण)
पंतच्या सामन्यात फलंदाजी करताना हेल्मेटमध्ये एक चेंडू लागला. पॅट कमिन्सच्या या बॉलने पंतच्या बॅटच्या कोपऱ्याला लागून हेल्मेटला लागला. यावेळी, त्याच्या डोक्याला दुखापत होण्याची भीती आहे. यामुळे भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान तो मैदानात येऊ शकला नाही आणि त्याच्या जागी राहुल सामन्यात विकेटकीपिंग करीत होता. रविंद्र जडेजा गोलंदाजी करत असताना राहुलकडून मोठी चूक झाली. जडेजाने मिडल आणि लेग स्टंपवर फ्लोट डिलिव्हरीसह सुरुवात केली. यानंतर, बॉलने आपली भूमिका बदलली आणि डेविड वॉर्नर (David Warner) च्या बॅटची आतील बाजू लागून विकेटच्या मागे गेला. राहुल चेंडू पकडण्यात अपयशी ठरला आणि चौकार गेला. या चुकीनंतर प्रेक्षकांनी धोनी-धोनीचा (Dhoni) जयघोष केला. पाहा व्हिडिओ:
— Darsh brahmbhatt (@darsh164) January 14, 2020
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावून भारताने 255 धावा केल्या. शिखर धवन याने 74 धावा आणि राहुल 47 धावा केल्या आणि दुसर्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली, मात्र भारताला याचा फायदा होऊ शकला नाही. 49.1 षटकांत ऑस्ट्रेलियाच्या धारदार गोलंदाजीसमोर यजमान संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांच्या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने सामना सहज जिंकला. वॉर्नर 128 आणि फिंच 110 धावांवर नाबाद परतले.
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2020 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

