IND Tour of AUS 2020: ‘दोन आठवडय़ांचा क्वारंटाइन अतिशय निराशाजनक', ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नियमात बदल करण्याची BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मागणी

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआयने 2020 अखेरीस भारत-ऑस्ट्रेलिया टीम एकमेकांच्या आमना-सामना करतील याची पुष्टी केली. विराट सेनेला ऑस्ट्रेलिया दोन आठवड्यांच्या क्वारंटाइन कालावधीतून जावे लागेल. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेची पुष्टी करताना भारतीय खेळाडूंसाठी वेगवान क्वारंटाइन कालावधी हवा आहे असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शनिवारी सांगितले.

टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) आणि बीसीसीआयने (BCCI) 2020 अखेरीस भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) टीम एकमेकांच्या आमना-सामना करतील याची पुष्टी केली. विराट कोहली आणि टीम ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी जाईल ज्यानंतर ते डिसेंबरमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिकेत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) बचाव करण्यासाठी ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध खेळतील ज्यामध्ये यंदा डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांचाही समावेश असेल आणि अखेरीस जानेवारीमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. कोविड-19चा (COVID-19) प्रभाव अजूनही कायम असल्याने विराट सेनेला ऑस्ट्रेलिया दोन आठवड्यांच्या क्वारंटाइन (Quaratine) कालावधीतून जावे लागेल. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेची पुष्टी करताना भारतीय खेळाडूंसाठी वेगवान क्वारंटाइन कालावधी हवा आहे असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाने दुसरे प्रभावित झालेले मेलबर्न शहर वगळता देशात होणारा कोरोना व्हायरसचा प्रसार तपासला आहे. (T20 World Cup 2020: मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन, परिस्थिती पाहून तरी टी-20 वर्ल्ड कपबद्दल अंतिम निर्णय घ्या, BCCI चा ICC ला टोला)

“होय, आम्ही या दौऱ्याची पुष्टी केली आहे. डिसेंबर महिन्यात आम्ही येणार आहोत. क्वारंटाइन दिवसाची संख्या थोडी कमी होईल अशी आम्हाला आशा आहे. कारण आम्हाला असे वाटत नाही की खेळाडूंनी सर्व इतके दूर जाऊन हॉटेलच्या खोल्यांमध्ये दोन आठवडे बसून राहावे. ते अतिशय निराशाजनक आहे,” गांगुलीने टीव्ही चॅनल India Todayला सांगितले. “आणि मी म्हटल्याप्रमाणे मेलबर्न वगळता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चांगल्या स्थितीत आहेत. त्या दृष्टीकोनातून आम्ही तिथे जात आहोत आणि आशा आहे की क्वारंटाइन दिवस कमी होतील.”

ऑस्ट्रेलियात 9,797 नागरिकांना करोनाची लागण झाली. यापैकी 7,728 व्यक्ती बरे झाले आहेत. दरम्यान, 8 जुलैपासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघ 9 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला ज्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. शिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या महिन्यात टी-20 वर्ल्ड कपच्या भविष्याबाबत निर्णय घेईल अशा चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणारेटी-20 वर्ल्ड कप यंदा रद्द करण्याची मागणी क्रिकेट ऑस्ट्रेलियासह अनेक क्रिकेट मंडळांनी केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement