ICC World Test Championship: साऊथॅम्प्टन क्युरेटरने खेळपट्टीबाबत केला मोठा खुलासा, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची वाढणार चिंता? वाचा सविस्तर

भारत आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत तर साऊथॅम्प्टन येथील हेड ग्राऊंड्समन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पेसी अँड बाउन्सी खेळपट्टी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हॅम्पशायर बाउल, साऊथॅम्प्टन खेळपट्टी (Photo Credit: Facebook)

ICC WTC Final Report: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत तर साऊथॅम्प्टन (Southampton) येथील हेड ग्राऊंड्समन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पेसी अँड बाउन्सी खेळपट्टी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत ज्यावर फिरकी गोलंदाजांना काही वेळाने साहाय्य मिळेल. 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. “या कसोटीसाठी खेळपट्टीची तयारी थोडीशी सोपी आहे कारण आम्ही तटस्थ स्थान आहोत, आम्हाला आयसीसीकडून मार्गदर्शन देण्यात आले आहे, पण आम्हाला सर्वांना एक चांगली खेळपट्टी हवी आहे जी दोन्ही संघाना समान स्पर्धा देणारी असेल,” लीने ESPNcricinfo ला सांगितले. (ICC WTC Final 2021: ब्लॉकबस्टर फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने; विराट, रोहित, बुमराह समवेत टीम इंडिया करणार विक्रमांची भरमार)

“वैयक्तिकरित्या माझ्यासाठी मला काहीतरी वेगवान हवे आहे ज्यामध्ये वेग, बाउन्स असणे आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये हवामानाचा फारसा फायदा होत नसल्याने हे करणे फार कठीण आहे. परंतु अंगभूत निर्मितीचा अंदाज बर्‍याच सूर्यासह चांगला आहे, म्हणून आम्हाला आशा आहे की आम्हाला जास्त वेग आणि रोलिंग न मारता एक कठीण खेळपट्टीवर मिळेल.” दोन्ही संघात उच्च दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत आणि ते नेहमीच खेळात असावेत अशी त्यांची इच्छा आहे. इंग्लंडची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. अंतिम सामन्याची खेळपट्टीही अशीच असणार आहे अशा परिस्थितीत किवी संघ थोडं वरचढ असेल कारण इंग्लंडला अशाच खेळपट्टीवर त्यांनी पराभूत करून ते फायनल सामन्यासाठी मैदानावर उतरतील. हवामानाच्या अंदाजानुसार, पाचही सामन्यांच्या दिवशी तापमान सुमारे 20 डिग्री सेल्सियस राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक कोरडे राहिल्यास अखेरच्या दोन दिवसांत फिरकी गोलंदाजही महत्त्वाचे ठरतील असा सायमन ली यांचे मत आहे.

दरम्यान, उद्घाटन डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी इंट्रा-स्क्वॉड सामना खेळून टीम इंडिया इंग्लिश परिस्थितीत समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला लोळवले आणि मालिका 1-0 ने जिंकून मालिका खिशात घातली. दुसऱ्या डावात इंग्लिश संघाला 122 धावांवर गुंडाळले ज्यामुळे किवी संघाला विजयासाठी 38 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांनी 2 विकेट गमावून गाठले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement