हरभजन सिंह याच्या डिलीट केलेल्या ट्विटवरून वाद, टीम इंडियाच्या 2011 वर्ल्ड कप खेळाडूला बाहेर करण्यासाठी 'राजकारण' केल्याचा केला धक्कादायक खुलास

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह याने 2011 वर्ल्ड कप विजयाबद्दल धक्कादायक खुलासा केला. 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच्या काही खेळाडूंना जाणीवपूर्वक संघातून वगळल्याचा आरोप केल्यानंतर माजी भारतीय फिरकीपटूने वाद निर्माण केला आहे. चाहत्यांनाही हरभजनने ट्विट का हटवले हे समजले नाही.

File Image | Harbhajan Singh | (Photo Credits: IANS)

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने 2011 वर्ल्ड कप (World Cup) विजयाबद्दल धक्कादायक खुलासा केला. 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच्या (Indian Team) काही खेळाडूंना जाणीवपूर्वक संघातून वगळल्याचा आरोप केल्यानंतर माजी भारतीय फिरकीपटूने वाद निर्माण केला आहे. हरभजनने ट्विटरवर 2011 वर्ल्ड कप फायनल दरम्यान टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध इलेव्हनचा फोटो शेअर केला होता. फोटोत असे लिहिले आहे की, "वर्ल्ड कप 2011 च्या विजेत्या इलेव्हनने या सामन्यानंतर कधीही वनडे सामना सोबत खेळला नाही." यांनतर चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) स्पिनरने दावा केला की टीम इंडियामधील हे 'राजकारण' आहे ज्यामुळे बऱ्याच खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली. टीम इंडियामध्ये घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल प्रामाणिकपणे पुस्तक लिहिण्याची वेळ आली आहे, असेही 39 वर्षीय फिरकीपटूने सांगितले, मात्र हरभजनने नंतर ते ट्विट डिलीट केले. ('एमएस धोनीला पुन्हा भारतासाठी खेळायचे नाही असे वाटत', माजी कर्णधाराच्या टीम इंडिया पुनरागमनावर हरभजन सिंह याने केले मोठे विधान)

या वादग्रस्त ट्विटमध्ये त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, आता वर्ल्ड कप जिंकताना घडलेल्या सर्व घटना चाहत्यांना समजतील. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "किती मजेदार आहे. वेळ आल्यावर, प्रत्येकाला एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी कोण कोणता गेम खेळत होता हे आपल्यास कळेल. बरंच काही घडत होतं. कदाचित हे पुस्तक लिहिण्याची आता वेळ आली असेल. जे घडले ते सर्व काही व्यक्त करणारे एक प्रामाणिक पुस्तक." चाहत्यांनाही हरभजनने ट्विट का हटवले हे समजले नाही. एका यूजरने लिहिले की, "आपण खालील ट्विट का हटविले हे समजू नका. हे खूप आवश्यक आहे. ही आपली खासगी कंपनी नाही जिथे लोक राष्ट्राकडून रहस्ये ठेवत असतात. चांगले जर आपण प्रामाणिक पुस्तक लिहिले आणि दोषी असल्यास खुलासा कराल. धन्यवाद."

हरभजन सिंहने हटविलेले ट्विट

हरभजन सिंहने हटविलेले ट्विट

नाखूष फॅन!

पुस्तक लिहा!

विशेष म्हणजे 2014 मध्ये हरभजनने म्हटले होते की टीमच्या निरोगी वातावरणामुळे 2011 मध्ये भारत वर्ल्ड कप जिंकू शकला. “2011 विश्वचषक स्पर्धेदरम्यान आमची टीम खरोखरच मजबूत होती.  परंतु सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रेसिंग रूममध्ये आमच्यात असलेले निरोगी टीम वातावरण. आमचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी एक मैत्रीपूर्ण युनिट तयार केले जे खरोखर पूर्णपणे एकत्रित होते."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement