भारत-पाकिस्तान सोबत त्रिकोणीय मालिकेच्या PCB च्या प्रस्तावाचे ऑस्ट्रेलियाकडून समर्थन, CA प्रमुख निक हॉकले यांनी सांगितला खास प्लान

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे प्रमुख निक हॉकली यांनी म्हटले की ऑस्ट्रेलिया पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सोबत त्रिकोणी मालिकेचे आयोजन करण्यासाठी तयार आहे. आशियाई कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी आणि एसीसी (एशियन क्रिकेट कौन्सिल) स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती.

विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: PTI)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी भारतासोबत हाय-प्रोफाइल त्रिकोणीय मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) प्रमुख निक हॉकले (Nick Hockley) यांनी म्हटले की विद्यमान विश्वविजेते त्रिकोणी मालिकेसाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी, भारत (India) आणि पाकिस्तानचा (Pakistan) पाहुणचार करण्यासाठी तयार असतील. 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रभावाची मालिका संपुष्टात आणली, तर आरोन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य फेरीत फेव्हरेट पाकिस्तान संघाचा पराभव करून अखेरीस दुबई येथे प्रथमच आयसीसी टी-20 जेतेपदाचा मान मिळवला. पीसीबी (PCB) प्रमुख राजा यांनी पारंपारिक भारत, पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आयसीसी बैठकीत चौकट मालिका प्रस्तावित करण्याचे म्हटले होते. क्रिकेट विश्वातील पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसी आणि एशियन क्रिकेट कौन्सिल स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. (BCCI सचिव जय शाह यांचा रमीज राजाला दिला दणका, PCB अध्यक्षच्या ‘4-राष्ट्रीय T20I मालिके’ स्पर्धेच्या प्रस्तावावर मोठी प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले)

ऑस्ट्रेलियामध्ये माजी विश्वविजेत्याचे आयोजन करून भारत-पाक संबंध पुन्हा सुरू करण्याबाबत बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॉकले म्हणाले की, बॅगी ग्रीन्सचे सर्वोच्च क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे आयोजन करण्यासाठी खुले असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळली गेली होती. टीम इंडियाने त्यावेळी एका छोट्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाचा पाहुणचार केला होता. दर्या, ऑस्ट्रेलियाच्या हॉकले यांनी क्रिकेटच्या दोन दिग्गज संघांचे घरच्या मैदानावर पाहुणचार करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी आयसीसीच्या खचाखच भरलेल्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे या वर्षी ही त्रिकोणी मालिका होण्याची शक्यता नाही.

“ऑस्ट्रेलियामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे मोठे समुदाय राहतात. ही एक स्पर्धा आहे जी प्रत्येकाला जागतिक क्रिकेटमध्ये पहायची आहे आणि जर आम्ही पुढील संधींना मदत करू शकलो तर आम्हाला ते करायला आवडेल,” हॉकले पुढे म्हणाले. लक्षात घ्यायचे की भारत आणि पाकिस्तान संघ यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आयसीसी टी-20 विश्वचषकच्या आपल्या सलामीच्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलिया 2022 आयसीसी वर्ल्ड टी-20 चे आयोजन करणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक सामन्याची तिकिटे आधीच काही मिनिटांत विकली गेली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now