Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली 'मुंबई'ने इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले, तब्बल 27 वर्षांनंतर केला पराक्रम

Irani Cup 2024: रहाणेच्या टीम मुंबईने 15 व्यांदा इराणी कप विजेतेपद पटकावले. लखनौमध्ये त्याचा सामना रेस्ट ऑफ इंडियाशी (MUM vs ROI) झाला. हा सामना ड्राॅ राहिला. पण मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. त्यासाठी सरफराज खानने (Sarfaraz Khan Double Hundred) पहिल्या डावात द्विशतक झळकावले होते.

Irani Cup Won MUM (Photo Credit - X)

Mumbai vs Rest of India: अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने (Mumbai) इराणी कप 2024 चे (Irani Cup 2024) विजेतेपद पटकावले आहे. या संघाने तब्बल 27 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली आहे. रहाणेच्या टीम मुंबईने 15 व्यांदा इराणी कप विजेतेपद पटकावले. लखनौमध्ये त्याचा सामना रेस्ट ऑफ इंडियाशी (MUM vs ROI) झाला. हा सामना ड्राॅ राहिला. पण मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. त्यासाठी सरफराज खानने (Sarfaraz Khan Double Hundred) पहिल्या डावात द्विशतक झळकावले होते. सरफराज खानने नाबाद 222 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: Devdutt Padikkal Catch Video: देवदत्त पडिक्कलने इराणी चषकात हवेत उडी मारत पृथ्वी शॉचा घेतला झेल, दाखवली बिबट्यासारखी चपळाई)

अभिमन्यू इसवरनची 191 धावांची दमदार खेळी

पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने सर्वबाद 537 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ इंडियाने पहिल्या डावात 416 धावा केल्या. त्यासाठी अभिमन्यू इसवरनने 191 धावांची दमदार खेळी केली. ईश्वरनने 16 चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर पुन्हा एकदा मुंबईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने दुसऱ्या डावात 8 गडी गमावून 329 धावा केल्या. तनुष कोटियनने या डावात शतक झळकावले. त्याने नाबाद 114 धावा केल्या.

मुंबईने 15व्यांदा इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले

मुंबईने 1959-60 मध्ये पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी संघाचे नाव बॉम्बे होते. तेव्हापासून त्यांनी एकूण 15 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने 1965-66 मध्ये रेस्ट ऑफ इंडियासोबतही एकदा ट्रॉफी शेअर केली होती. मुंबईने 27 वर्षांनंतर विजयाची नोंद केली आहे. याआधी 1997-98 मध्ये शेवटचा विजय मिळवला होता.

मुंबईने 27 वर्षांनंतर पटकावले जेतेपद , सरफराजने द्विशतक

मुंबईने 27 वर्षांनंतर इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले. त्यासाठी सरफराज खानने पहिल्या डावात नाबाद द्विशतक झळकावले. त्याने 286 चेंडूंचा सामना करत 222 धावा केल्या. सरफराजच्या या खेळीत 25 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तनुष कोटियनने अर्धशतक झळकावले. त्याने 64 धावा केल्या. तनुषने दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावले. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात 97 धावा केल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement